शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

हार्वेस्टरने हरविली धान मळणीची मजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:53 IST

धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातील खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजेपुढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । उन्हाळी धान पिकाच्या मळणीसाठी हार्वेस्टर यंत्र विसोरा परिसरात झाले दाखल

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातील खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजेपुढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे धान मळणीची पूर्वीची मजा आता संपली आहे.रोजच्या संशोधन तंत्राच्या बळावर तयार होत असलेल्या यंत्रांनी मानवी जीवनाच्या परिघातील प्रत्येक बिंदूला स्पर्श केला आहे. जे काम फक्त मानवच करू शकतो, असा दृढ समाज मानवाचा होता. मात्र हा समज यंत्रांनी खोटा ठरविला आहे. कृषीप्रधान भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धानाची मळणी करण्यासाठी एक दशकापूर्वी बैल किंवा बैलबंडी हाच एकमेव मळणी यंत्र होता. पुढे ट्रॅक्टरवर चालणारे मळणी यंत्र आले. आता तर त्याच्याही पुढचे तंत्रज्ञान म्हणजे, हार्वेस्टरचा वापर सुरू झाला आहे. हार्वेस्टरच्या वापरामुळे धानाची कापणी, बांधणी व मळणीचा खर्च वाचतो. त्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरचा वापर करीत आहेत. विशेष करून उन्हाळी धान पिकासासाठी हार्वेस्टरचा वापर शेतकरी करीत असल्याचे दिसून येते.कृषी क्षेत्रात यंत्रे आल्याने शेतीची अवघड कामे आता सोपी झाली आहेत. त्यामुळे यंत्रांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला असल्याचे दिसून येते. खरीप हंगामात ट्रॅक्टरवर चालणारे साधे मळणी यंत्र वापरले जाते. मात्र उन्हाळी धान पिकासासाठी विसोरा परिसरातील बहुतांश शेतकरी हार्वेस्टरचाच वापर अधिकाधिक प्रमाणात करीत असल्याचे दिसून येते.खर्च वाढला मात्र उत्पादन तेवढेचपूर्वीच्या काळात संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे सर्व कुटुंब शेतात राबत होते. त्यामुळे शेतीचा खर्च अतिशय कमी होता. रोवणी, कापणी, बांधणी, मळणी ही कामे कुटुंबातील सदस्य स्वत: करीत होते. खते व कीटकनाशकांच्या खरेदीवरच खर्च होत होते. मात्र आता धानाच्या रोवण्यापासून ते मळण्यापर्यंत यंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. मात्र उत्पादनात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. त्यामुळे शेती तोट्याची ठरत आहे.काय आहे हार्वेस्टर यंत्रउन्हाळी धान पिकाची कापणी उन्हाळ्यात होते. कडक उन्हाळ्यात धान पिकाची मळणी करणे शक्य होत नाही. कापणी व बांधणी करण्यास मजूर मिळत नाही. त्यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर केला जातो. हार्वेस्टर यंत्र धानाची कापणी करतात. त्याच वेळी मळणी सुध्दा होते. मळणी झालेले धान यंत्राच्या डब्यात एका ठिकाणी जमा होते. एकाच वेळी सर्व कामे होत असल्याने शेतकरी वर्ग हार्वेस्टर यंत्राच्या वापराला पसंती दर्शवित आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती