शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दीडशे वर्षांपासून हरीनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:43 IST

स्त्री म्हणजे शक्ती. अलौकिक, अद्भुत, अनाकलनीय अशा स्त्रीशक्तीच्या विविधांगी नऊ रुपांसमोर नतमस्तक होण्याचाच नव्हे तर पूजनाचा नऊ रात्रींचा उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव.

ठळक मुद्देकोकडी येथे अखंड परंपरा : नवरात्रोत्सवात गावात एकोप्याचे दर्शन

विष्णू दुनेदार/अतुल बुराडे।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी/विसोरा : स्त्री म्हणजे शक्ती. अलौकिक, अद्भुत, अनाकलनीय अशा स्त्रीशक्तीच्या विविधांगी नऊ रुपांसमोर नतमस्तक होण्याचाच नव्हे तर पूजनाचा नऊ रात्रींचा उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव. मानव जातीवर तथा सृष्टीवर आरुढ होऊ पाहणाºया वाईट प्रवृत्तींच्या नायनाटासाठी, त्यातून मुक्त होण्यासाठी आदीशक्तीची आराधना नवरात्रोत्सवात केली जाते. हीच परंपरा सामाजिक, मानवसेवा व आदरभावाने देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे मागील १५० वर्षांच्या कालावधीपासून नवरात्रीत हरीनाम सप्ताहाच्या रुपात आजही जोपासली जात आहे.कोकडी येथे नवरात्री उत्सवानिमित्त मोठा देऊळ हनुमान मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह व घटस्थापना करण्याची परंपरा सुरू आहे. याबाबत कोकडीचे वयोवृध्द नागरिक गोपाळा मंगरु बन्सोड सांगतात की, त्यांची आई सीताबाई बन्सोड यांचे ३० वर्षांपूर्वी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. तेव्हा गोपाळा बन्सोड हे लहान होते. त्यांच्या आईने लहानपणीच्या नवरात्र उत्सवाच्या प्रारंभाबद्दल सांगितले. गावात सुखसमृध्दी नांदावी, कल्याण व्हावे, लोकांमध्ये आपुलकी, प्रेम, आदर, समर्पण तथा समजूतदारीची भावना वाढीस लागून गावात निरंतर एकोपा टिकून राहावा यासाठीच आमच्या पूर्वजांनी ही भक्ती, प्रार्थना सुरु केली असल्याच्या प्रतिक्रिया ज्येष्ठ मंडळींनी दिल्या. गावातील मंडळींनी ३८ वर्षांपूर्वी लहान हनुमान मंदिर नावाचे देऊळ बांधले. या मंदिरात सुध्दा ३८ वर्षांपासून अखंडपणे हरिनाम सप्ताह व घटस्थापना ही परंपरा सुरू आहे.सात दिवस अनोखा उत्सवनवरात्रीच्या सात दिवसांत सतत कसलाही खंड पडू न देता भजन गायन म्हणजे अखंड टाळी आणि अखंड तेवत राहणारे दीप पेवत असतो. यात अखंड टाळीला विशेष महत्त्व आहे. भजनासाठी गावातील लोकांच्या भजनी मंडळीचे चार गट पाडले आहेत. जे चारचार तासांच्या पाळीत भजन गातात. याशिवाय तुळशीचे जय हनुमान भजनी मंडळ म्हणून आमंत्रित भजनी मंडळ म्हणून यात दरवर्षी सहभागी होतात. या भजनी मंडळातील कलावंतांना तसेच १५० वर लोकांना येथीलच दानशूर व्यक्ती सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी सायंकाळी स्वखर्चाने जेवण देतात. शेवटच्या दिवसाला संपूर्ण गावाला जेवण दिल्या जाते. सुरुवातीला तुळशी, पोटगाव, विसोरा, शिवराजपूर, नैनपूर, किन्हाळा, उसेगावचे भजनी मंडळ दिंडीसह येतात.