शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

असे घडले सत्ता स्थापनेचे नाट्य

By admin | Updated: March 22, 2017 01:50 IST

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात पूर्वीच आघाडी झाली होती.

रात्रभर चालली उलथापालथ : धर्मरावबाबांशी चर्चेनंतर आविसंला मिळाले उपाध्यक्षपद गडचिरोली : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात पूर्वीच आघाडी झाली होती. या आघाडीसोबत गडचिरोली तालुक्यातून निवडून आलेल्या अपक्ष सदस्यही होत्या. त्यामुळे बहुमताचे संख्याबळ भाजपजवळ जुळलेले होते. त्यामुळे सोमवारी नागपुरात चर्चेचा खल सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जगन्नाथ बाजीराव बोरकुटे यांनी आपल्याला उपाध्यक्ष पद मिळाले पाहिजे, अशी अट घातली. सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोरकुटेंच्या या अटीला नकार दिला होता. मात्र सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बोरकुटे यांच्या उपाध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी याला होकार दिला होता. मात्र त्याचवेळी भाजपकडे असलेल्या अपक्ष सदस्य वर्षा कौशीक यांनी आपल्याला अध्यक्ष पद मिळायला हवे, असा दावा भाजप नेत्यांकडे त्यांच्या यजमानांच्या मार्फतीने केला. त्यामुळे भाजपचा पेच वाढला. आपण २० चे संख्याबळ असूनही सत्तेपासून दूर राहू शकतो, याची चाहूल भाजपला लागली. त्यामुळे रात्री साडेनऊ वाजतानंतर भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपातकालीन बैठक घेत परिस्थितीवर पूर्ण गंभीरतेने चर्चा केली व त्यानंतर आदिवासी विद्यार्थी संघाला आपल्यासोबत घेतले पाहिजे, यावर त्यांचे एकमत झाले. त्यानंतर आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. दीपक आत्राम यांनी आविसंला उपाध्यक्ष पद मिळेल तर आपल्यासोबत येणे शक्य होईल, असे भाजपला सांगितले. त्यानंतर लगेच भाजप नेत्यांनी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. धर्मरावबाबा आत्राम यांनी तत्काळ मोठे मन करीत राष्ट्रवादी काँग्र्रेस भाजपसोबतच राहिल, असे स्पष्ट केले व उपाध्यक्ष पदावरचा आपल्या पक्षाचा दावा त्यांनी सोडला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी संघाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत घेण्यात भाजपला सहज सोपे झाले. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असल्याने आपल्या पक्षाची सत्ता कुठल्याही परिस्थिती स्थापन झाली पाहिजे, ही भाजपच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गडचिरोली जिल्ह्याच्या या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. रात्री १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व आविसं यांचे सत्ता समिकरण जुळण्याचा मार्ग मोकळा झाला. (जिल्हा प्रतिनिधी)