अहेरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत शहरात मानव मंदिर, आठवडी बाजार व मस्जिद चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वत: हातात झाडू घेऊन मुख्य मार्गाची स्वच्छता केली. यावेळी शहरातील युवक, शाळकरी विद्यार्थी, भाजप व नाविसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गांधी जयंती निमित्त अहेरी शहरातील रस्ते पूर्णत: स्वच्छता करण्यात आले. तसेच रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
राजनगरीच्या स्वच्छतेसाठी पालकमंत्र्यांच्या हाती झाडू
By admin | Updated: October 3, 2015 01:22 IST