शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:53 IST

एटापल्ली तालुक्यातील उडेरा-बुर्गी मार्गावर पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात वाढणार अडचण : उडेरा-बुर्गी मार्गाच्या दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबुर्गी : एटापल्ली तालुक्यातील उडेरा-बुर्गी मार्गावर पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.तीन वर्षांपूर्वी बुर्गी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम आले होते. उडेरा ते बुर्गी दरम्यानचा मार्ग अतिशय खराब असल्याने सदर मार्ग दुरूस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर या मार्गाच्या दुरूस्तीला सुरूवात झाली आहे. मात्र सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. सदर भाग नक्षलप्रभावित आहे. त्यामुळे नक्षल बंदचे आवाहन झाल्यानंतर काम ठप्प पडते. परिणामी कामास विलंब होत चालला आहे. बुर्गी जवळ कंत्राटदाराने पुलाचे बांधकाम करण्यासाठी रस्ता खोदून ठेवला आहे. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याच्या बाजुने बायपास मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र या बायपास मार्गाने जड वाहन नेणे शक्य होत नाही. पावसाचे पाणी बाजुला साचल्यानंतर रहदारी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याची मागणी आहे.