शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

निम्म्या शाळांमध्ये वीजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:54 IST

दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यात एकूण २४९ शाळा आहेत. त्यापैकी १४७ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तर १०२ शाळांचे विद्युतीकरण झालेच नाही. ज्या शाळांचे विद्युतीकरण झाले आहे, त्या शाळांनी वीज बिल भरला नसल्याने संबंधित शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यातील स्थिती : डिजिटल व शैक्षणिक साहित्य धूळखात पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यात एकूण २४९ शाळा आहेत. त्यापैकी १४७ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तर १०२ शाळांचे विद्युतीकरण झालेच नाही. ज्या शाळांचे विद्युतीकरण झाले आहे, त्या शाळांनी वीज बिल भरला नसल्याने संबंधित शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.अध्ययनात विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी, तसेच जास्त काळ लक्ष केंद्रीत व्हावे, यासाठी अध्यापन करताना जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्य व डिजिटल साधनांचा वापर करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार अनेक शाळांच्या शिक्षकांनी स्वत:कडचे पैसे खर्च करून तसेच लोकवर्गणी गोळा करून टीव्ही, प्रोजेक्टर व इतर डिजिटल साहित्य खरेदी केले. सदर साहित्य चालविण्यासाठी विजेची आवश्यकता आहे. मात्र शाळेत वीजच नसल्याने हे सर्व साहित्य धूळखात पडून आहेत. ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या एकूण निधीपैकी काही निधी शिक्षणावर खर्च करावा लागतो. या निधीतून शाळेचे वीज बिल भरणे शक्य आहे. मात्र ग्रामपंचायत शिक्षणासाठी असलेला निधी इतर कामांवर खर्च करते. शासन सुद्धा शाळांचे वीज बिल भरण्यास पुढाकार घेत नाही. त्यामुळे वीज बिल भरण्याची गंभीर समस्या शाळांना उपस्थित होते. एखादेवेळी जास्त बिल आल्यानंतर शाळेला वीज बिल भरणे शक्य होत नाही. परिणामी महावितरण वीज पुरवठा खंडित करते. ज्या शाळांना वीज पुरवठा झाला आहे, त्यापैकी निम्म्याहून अधिक शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.ज्या शाळांमध्ये वीज नाही, अशा शाळांची माहिती आकांक्षित जिल्हा अंतर्गत वरिष्ठांकडे सादर केली आहे. सदर शाळांमध्ये सोलर वीज निर्मिती केंद्र लावले जाणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी दिली.कौलारू शाळांची दुरवस्थाप्रत्येकाला पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन केंद्र व राज्य शासनाकडून दिले जात आहे. मात्र ज्या शाळा कौलारू आहेत, त्या निर्लेखित करून पक्क्या इमारती बांधण्यासाठी शासन निधी देत नाही. अनेक शाळांच्या इमारती गळतात. सोयीसुविधांचाही अभाव आहे. त्याच इमारतीत विद्यार्थ्यांना अध्ययन करावे लागते.

टॅग्स :Schoolशाळाelectricityवीज