शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

निम्म्याच शाळा प्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:28 IST

शिक्षण विभागाने ठरवून दिलेले २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते.

ठळक मुद्देमोहीम थंडावली : शाळांमध्ये सोईसुविधांचा अभाव; शिक्षकांचे मन लागेना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिक्षण विभागाने ठरवून दिलेले २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार २३ शाळा आहेत. यापैकी केवळ १ हजार ३७ शाळा प्रगत असून सुमारे ९८६ शाळा प्रगतसाठी अजूनही संघर्ष करीत आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाअंतर्गत २२ जून २०१६ रोजी राज्य शासनाने प्रगत शाळेचे २५ निकष ठरवून दिले. यामध्ये शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापनात डिजिटल साधनांचा वापर, पायाभूत चाचणीतील विद्यार्थ्यांचे गुण, त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांमधील अध्यापन क्षमता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेच्या मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम आदींचा समावेश आहे. ही किमान २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते.शासन निर्णय काढल्यानंतर शाळा प्रगत करण्यासाठी मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शाळा, केंद्र व जिल्ह्यात मोठी स्पर्धा होत होती. शाळा प्रगत व्हावी, यासाठी शिक्षक धडपडतही होते. शाळा प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागावर दबाव होता. यावर्षी मात्र हा दबाव पूर्णपणे हटल्याने शिक्षकांनी शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शाळा प्रगत करण्याची मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ हजार २०२ प्राथमिक शाळा, ८२१ उच्च प्राथमिक शाळा अशा एकूण २ हजार २३ शाळा आहेत. त्यापैकी ६९१ प्राथमिक शाळा व ३४६ उच्च प्राथमिक शाळा प्रगत म्हणून घोषित केल्या आहेत. अजूनही ३२१ प्राथमिक शाळा व ४७५ उच्च प्राथमिक शाळा अप्रगत आहेत. या शाळांना प्रगतशील शाळा असे संबोधण्यात आले आहेत. उर्वरित शाळांमध्येही सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन त्या प्रगत करण्याची मागणी होत आहे.अध्यापनापेक्षा बदलीकडेच जास्त लक्षग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत पूर्णपणे बदल केला आहे. मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या नाही. बदलीपात्र शिक्षकांकडून वेळोवेळी माहिती मागितली जात आहे. याच प्रक्रियेत शिक्षकवर्ग मागील चार महिन्यांपासून अडकला आहे. अध्यापनापेक्षा बदलीच्याच चर्चा शिक्षकांमध्ये अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.