शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

कोसळल्याने अर्धे धान अपरिपक्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 6:00 AM

आष्टी परिसरात प्रामुख्याने जड धानाचे उत्पादन घेतले जाते. काही शेतकरी मध्यम कालावधीच्याही धानाची लागवड करतात. जड धान नेमके निसवले असताना अवकाळी पावसाचा जोर वादळ वाऱ्यासह वाढला. त्यामुळे धान जमिनीवर कोसळले. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे. धानाचे लोंब पाण्यात असल्याने ते खराब झाले आहेत. मध्यम प्रतीच्या धानाची कापणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देउत्पादनात होणार घट । नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी परिसरात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान कोसळले आहे. कोसळलेल्या धानाचे अर्धे लोंब परिपक्व आहेत. तर अर्धे लोंब परिपक्व झाले नाही. यामुळे मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आष्टी परिसरात प्रामुख्याने जड धानाचे उत्पादन घेतले जाते. काही शेतकरी मध्यम कालावधीच्याही धानाची लागवड करतात. जड धान नेमके निसवले असताना अवकाळी पावसाचा जोर वादळ वाऱ्यासह वाढला. त्यामुळे धान जमिनीवर कोसळले. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे. धानाचे लोंब पाण्यात असल्याने ते खराब झाले आहेत. मध्यम प्रतीच्या धानाची कापणी शेतकऱ्यांनी केली आहे. सदर धान मळून झाल्यानंतर वाळवावे लागत आहे. धान काळे पडले असल्याने या धानाला कमी भाव मिळणार आहे. आष्टी येथील आलापल्ली मसाहत येथील चोखाजी उंदीरवाडे यांची एक एकरातील धानपीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. उंदीरवाडे यांच्याकडे दोन एकर जागा आहे. त्यात जयश्रीराम व एचएमटी धानाची लागवड केली आहे. जवळपास एका एकरातील धान कोसळल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून त्यांनी २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. सदर कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकºयासमोर निर्माण झाले आहे. आष्टी परिसरातील शेकडो हेक्टरवरील धानपीक नष्ट झाले आहे. प्रशासन, तलाठी, कृषी सहायक पंचनामे करीत आहेत. पंचनामे केल्यानंतर शासनाने प्रती एकरी किमान १५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. अजुनही काही परिसरात पंचनामे करणे सुरूच असल्याने प्रत्यक्ष मदत मिळण्यास विलंब होणार आहे.

टॅग्स :agricultureशेती