शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अर्ध्या जिल्ह्याला बसला वादळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST

गडचिराेली : भर एप्रिल महिन्याच्या उन्हात बुधवारी (दि.२१) अवकाळी पावसाने दक्षिण भागातील अर्ध्या तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला. जोरदार वादळ आणि ...

गडचिराेली : भर एप्रिल महिन्याच्या उन्हात बुधवारी (दि.२१) अवकाळी पावसाने दक्षिण भागातील अर्ध्या तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला. जोरदार वादळ आणि विजांच्या थयथयाटासह आलेल्या या पावसाने अनेक घरांवरील टिनाचे छत हवेत उडवले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे काही भागांत झाडांचीही पडझड झाली. यादरम्यान अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.

चामाेर्शी शहरासह तालुक्यात जाेरदार वादळीवाऱ्यासह पाऊस बरसला. तालुक्यातील नागपूर चक या गावात वादळी पावसामुळे घरांची पडझड झाली. टिनपत्रे व कवेलू उडून पडाली आहेत. अनेक घरमालकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये संताेष रायसिडाम, रवी मडावी, जीवन भाेयर, सुखदेव भाेयर, रत्नाकर भाेयर आदींचा समावेश आहे. संताेष रायसिडाम यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. भामरागड येथेही वादळी पाऊस बरसला. काही घरांवरील टिनपत्रे व कवेलू उडून खाली पडली. एटापल्ली शहरासह तालुक्यात वादळी पाऊस बरसला. काही वेळ विजेचा जाेरदार कडकडाट हाेता. धानाेरा येथे विजेचा कडकडाट हाेता; पण पाऊस बरसला नाही. अहेरी तालुक्यातही पाऊस बरसला नसल्याची माहिती आहे.

गेल्या दाेन दिवसांपासून वातावरण काहीसे ढगाळ आहे. बुधवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि काही वेळातच मेघगर्जनेसह १५ ते २० मिनिटे, तर काही ठिकाणी अर्धा तास पावसाने हजेरी लावली. चामोर्शी, अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तालुक्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. गडचिराेली शहरासह तालुक्यातील अनेक गावांत वादळासह हलकासा पाऊस झाला. त्यामुळे काही गावांतील वीजपुरवठा खंडित झाला हाेता. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

भामरागड येथेही वादळी पाऊस बरसला. काही घरांवरील टिनपत्रे व कवेलू उडून खाली पडली. एटापल्ली शहरासह तालुक्यात वादळासह विजेचा जाेरदार कडकडाट हाेता. धानाेरा येथेही वादळी पाऊस बरसला.

(बॉक्स)

अनेक घरांवरील टिन, कवेलू उडाले

चामाेर्शी शहरासह तालुक्यात जाेरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. नागपूर चक या गावात वादळाने घरांची पडझड झाली. टिनपत्रे व कवेलू उडून पडली. अनेक घरमालकांचे नुकसान झाले. यामध्ये संताेष रायसिडाम, रवी मडावी, जीवन भाेयर, सुखदेव भाेयर, रत्नाकर भाेयर आदींचा समावेश आहे. रायसिडाम यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे.