शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

कोरची शहरातील मुख्य मार्गावरून पाणी वाहत असल्याने रस्ताही पाण्याखाली गेला होता. सायंकाळी वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पूर्ण रात्र कोरचीकरांनी अंधारात काढली. मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरची शहरातील वाॅर्ड क्रमांक २, ते ६ मध्ये जंगलातून आलेल्या वानरांनी धुमाकूळ सुरू केला आहे. त्यांच्या उड्या मारण्याने नागरिकांच्या घराच्या छतावरील कौले फुटली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या अनेक भागांत मंगळवारच्या रात्री आणि बुधवारच्या पहाटे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यातच दुपारी चामोर्शी, कोरची तालुक्यासह इतर काही भागात गारपीटही झाली. याचा फटका रब्बी पिकांसह खरिपातील उघड्यावर असलेल्या धानाला बसला आहे. कोरची तालुक्यात वीज पडून बैल ठार झाला. गारपीट आणि पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरला आहे.गडचिरोली शहरात मंगळवारी (दि. २८) रात्री पावसाचा एक ठोक येऊन गेल्यानंतर रात्री बराच वेळपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. त्यानंतर पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. दिवसभर ढगाळ वातावरणासह गारवा पसरला होता. दुपारी गडचिरोली शहराच्या सर्वोदय वॉर्डात आलेल्या १५ ते २० वानरांच्या टोळीने अनेक घरांवर धुमाकूळ घातला. घराच्या आवारात असलेल्या पेरूच्या झाडांवर उड्या मारत पेरूवर ताव मारत ही टोळी निघून गेली.

कोरची तालुक्यात अनेक घरांचे नुकसान

कोरची : येथे मंगळवारी सायंकाळी २० ते २५ वानरांनी धुमाकूळ घालत अनेकांच्या घरांची कौले फोडली. त्यानंतर अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे अनेक घरांना गळती लागली होती. मंगळवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोरची शहरातील मुख्य मार्गावरून पाणी वाहत असल्याने रस्ताही पाण्याखाली गेला होता. सायंकाळी वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पूर्ण रात्र कोरचीकरांनी अंधारात काढली. मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरची शहरातील वाॅर्ड क्रमांक २, ते ६ मध्ये जंगलातून आलेल्या वानरांनी धुमाकूळ सुरू केला आहे. त्यांच्या उड्या मारण्याने नागरिकांच्या घराच्या छतावरील कौले फुटली. नागरी वस्तीमधील वालाच्या शेंगा, चवळीच्या सेंगा, तूर, लाखोळी आणि विशेष करून पेरूच्या झाडांवर पेरू खाण्यासाठी वानरांचा प्रयत्न सुरू होता. वानरांच्या धुमाकुळानंतर रात्रभर अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे घरांमध्ये पाणी गळती सुरू झाली. हे कमी होते म्हणून की काय, बुधवारी दुपारी गारपीटही झाली. त्यामुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. बुधवारी सकाळी पुन्हा वानरांनी शहरात हजेरी लावली. यावेळीही त्यांनी रात्रभर ओल्या झालेल्या कवेलूंचे नुकसान केले. वानरांच्या धाकामुळे अनेक लोकांनी घराच्या आवारातील पेरूची झाडे कापायला सुरुवात केली आहे.

रब्बी पिकांची हानी

वैरागड : मागील तीन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ऐन बहरात असलेले कमी मुदतीचे तूर पीक पिवळे पडू लागले आहे. आरमोरी, कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. भुईमुगाचे पीक आता शेवटच्या टप्प्यात आहे. अशातच जोरदार पाऊस झाल्याने शेंगांना कोंब फुटून भुईमुगाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

देसाईगंज तालुक्यात भाजीपाल्याचे नुकसान

-    देसाईगंज तालुक्यात मंगळवारच्या रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे कमी पावसावर पिकणारे रब्बी कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या बांध्यात लाख, लाखोळी, हरभरा, तूर, वाटाणा, मूग पिके आहेत. पावसाच्या सरीवर सरी आल्याने शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह इतर पिके खराब होण्याची शक्यता आहे. तालुक्यात जवळपास २०० ते ३०० हेक्टरमध्ये कारल्याची लागवड झाली आहे. सर्व वेलवर्गीय पिकेही धोक्यात आली आहेत. मातीपासून बनविलेल्या कच्च्या विटाही पाण्यात मुरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले.-    अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह व्यावसायिकांची दाणादाण उडविली आहे. बुधवारला गडचिराेली जिल्ह्यात आठवडी बाजार भरला हाेता. पावसाने अनेक विक्रेत्यांचे नुकसान झाले. 

 

टॅग्स :Rainपाऊस