शहरं
Join us  
Trending Stories
1
Train Update : वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
2
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
3
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
4
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
5
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
6
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
7
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
8
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
9
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
10
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
11
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
12
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
13
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
15
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
16
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
17
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
18
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
19
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
20
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण

शेतात रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:12 IST

आॅनलाईन लोकमतचामोर्शी : अत्यल्प पाऊस, कीड व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने खरीप हंगामातील धान पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. या नंतरही अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, तुर, उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी केली. सदर पिके अंतिम टप्प्यात असताना रानडुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...

ठळक मुद्देहरभरा पीक उद्ध्वस्त : रबी पीकही हातून जात असल्याने शेतकरी हवालदिल

आॅनलाईन लोकमतचामोर्शी : अत्यल्प पाऊस, कीड व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने खरीप हंगामातील धान पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. या नंतरही अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, तुर, उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी केली. सदर पिके अंतिम टप्प्यात असताना रानडुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे विदारक चित्र चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरासह संपूर्ण चामोर्शी तालुका व जिल्ह्याच्या विविध भागात दिसून येत आहे.यंदाच्या रबी हंगामात भेंडाळा, मोहुर्ली, कान्होली, फराडा, मार्र्कंडादेव आदींसह लगतच्या भागात अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल तसेच भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. अत्यंत विपरित परिस्थितीतही शेतकऱ्यांनी शेतीला पाणी पुरवठा करून मशागत केली. पेरणी झाल्यानंतर आता रबी हंगामातील ही पिके शेतकऱ्यांच्या हाती येण्याच्या उंबरठ्यावर आहेत. हरभरा व तूर पूर्णत: भरले असून येत्या काही दिवसांत हरभराच्या खोदणीच्या कामास सुरूवात होणार आहे. नेमक्या अशाच वेळी भेंडाळा परिसरातील शेतामध्ये रानडुकरे प्रवेश करून हैदोस घालीत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ही पिके रानडुकरांनी उद्ध्वस्त केली आहेत. मात्र रानडुकराच्या बंदोबस्तासंदर्भात वन विभागाचे अधिकारी गंभीर नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या संदर्भात महसूल, कृषी व वन विभागाने संयुक्तरित्या धडक मोहीम राबवून रबी हंगामातील नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळेल, अशी मागणी भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना साकडेभेंडाळा येथील प्रभाकर डांगे यांनी आपल्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. हरभरा पूर्णत: भरलेला असताना रानडुकरांनी शेतात धूडघूस घालून हे पीक नष्ट केले. त्यामुळे मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी डांगे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोमवारी चामोर्शीच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.