शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतात रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:12 IST

आॅनलाईन लोकमतचामोर्शी : अत्यल्प पाऊस, कीड व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने खरीप हंगामातील धान पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. या नंतरही अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, तुर, उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी केली. सदर पिके अंतिम टप्प्यात असताना रानडुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...

ठळक मुद्देहरभरा पीक उद्ध्वस्त : रबी पीकही हातून जात असल्याने शेतकरी हवालदिल

आॅनलाईन लोकमतचामोर्शी : अत्यल्प पाऊस, कीड व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने खरीप हंगामातील धान पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. या नंतरही अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, तुर, उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी केली. सदर पिके अंतिम टप्प्यात असताना रानडुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे विदारक चित्र चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरासह संपूर्ण चामोर्शी तालुका व जिल्ह्याच्या विविध भागात दिसून येत आहे.यंदाच्या रबी हंगामात भेंडाळा, मोहुर्ली, कान्होली, फराडा, मार्र्कंडादेव आदींसह लगतच्या भागात अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल तसेच भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. अत्यंत विपरित परिस्थितीतही शेतकऱ्यांनी शेतीला पाणी पुरवठा करून मशागत केली. पेरणी झाल्यानंतर आता रबी हंगामातील ही पिके शेतकऱ्यांच्या हाती येण्याच्या उंबरठ्यावर आहेत. हरभरा व तूर पूर्णत: भरले असून येत्या काही दिवसांत हरभराच्या खोदणीच्या कामास सुरूवात होणार आहे. नेमक्या अशाच वेळी भेंडाळा परिसरातील शेतामध्ये रानडुकरे प्रवेश करून हैदोस घालीत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ही पिके रानडुकरांनी उद्ध्वस्त केली आहेत. मात्र रानडुकराच्या बंदोबस्तासंदर्भात वन विभागाचे अधिकारी गंभीर नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या संदर्भात महसूल, कृषी व वन विभागाने संयुक्तरित्या धडक मोहीम राबवून रबी हंगामातील नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळेल, अशी मागणी भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना साकडेभेंडाळा येथील प्रभाकर डांगे यांनी आपल्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. हरभरा पूर्णत: भरलेला असताना रानडुकरांनी शेतात धूडघूस घालून हे पीक नष्ट केले. त्यामुळे मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी डांगे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोमवारी चामोर्शीच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.