शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतात रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:12 IST

आॅनलाईन लोकमतचामोर्शी : अत्यल्प पाऊस, कीड व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने खरीप हंगामातील धान पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. या नंतरही अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, तुर, उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी केली. सदर पिके अंतिम टप्प्यात असताना रानडुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...

ठळक मुद्देहरभरा पीक उद्ध्वस्त : रबी पीकही हातून जात असल्याने शेतकरी हवालदिल

आॅनलाईन लोकमतचामोर्शी : अत्यल्प पाऊस, कीड व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने खरीप हंगामातील धान पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. या नंतरही अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, तुर, उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी केली. सदर पिके अंतिम टप्प्यात असताना रानडुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे विदारक चित्र चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरासह संपूर्ण चामोर्शी तालुका व जिल्ह्याच्या विविध भागात दिसून येत आहे.यंदाच्या रबी हंगामात भेंडाळा, मोहुर्ली, कान्होली, फराडा, मार्र्कंडादेव आदींसह लगतच्या भागात अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल तसेच भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. अत्यंत विपरित परिस्थितीतही शेतकऱ्यांनी शेतीला पाणी पुरवठा करून मशागत केली. पेरणी झाल्यानंतर आता रबी हंगामातील ही पिके शेतकऱ्यांच्या हाती येण्याच्या उंबरठ्यावर आहेत. हरभरा व तूर पूर्णत: भरले असून येत्या काही दिवसांत हरभराच्या खोदणीच्या कामास सुरूवात होणार आहे. नेमक्या अशाच वेळी भेंडाळा परिसरातील शेतामध्ये रानडुकरे प्रवेश करून हैदोस घालीत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ही पिके रानडुकरांनी उद्ध्वस्त केली आहेत. मात्र रानडुकराच्या बंदोबस्तासंदर्भात वन विभागाचे अधिकारी गंभीर नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या संदर्भात महसूल, कृषी व वन विभागाने संयुक्तरित्या धडक मोहीम राबवून रबी हंगामातील नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळेल, अशी मागणी भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना साकडेभेंडाळा येथील प्रभाकर डांगे यांनी आपल्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. हरभरा पूर्णत: भरलेला असताना रानडुकरांनी शेतात धूडघूस घालून हे पीक नष्ट केले. त्यामुळे मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी डांगे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोमवारी चामोर्शीच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.