शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

शिक्षकांनो, रूजू व्हा! अन्यथा कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:46 IST

आॅनलाईन बदलीदरम्यान अपेक्षित शाळा न मिळाल्याने काही शिक्षकांनी जाणूनबुजून वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत रूजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, .........

ठळक मुद्देसीईओंच्या परिपत्रकानंतर शिक्षकांमध्ये खळबळ : इच्छित शाळा न मिळाल्याने शिक्षक वैद्यकीय रजेवर

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅनलाईन बदलीदरम्यान अपेक्षित शाळा न मिळाल्याने काही शिक्षकांनी जाणूनबुजून वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत रूजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी १६ आॅगस्ट रोजी काढले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक शाळा नक्षलग्रस्त, आदिवासी बहूल व जंगल भागात आहेत. काही गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. नदी, नाले पार करून शाळेत जावे लागते. तर काही गावांचे अंतर तालुकास्थळापासून १०० ते १२० किमी असल्याने तालुकास्थळी राहून अपडाऊन करणेही शक्य होत नाही. एवढेच नाही तर अहेरी, एटापल्ली तालुक्यातील काही शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना सीमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यातील गावांमध्ये भाड्याचे घर करून राहावे लागते. गडचिरोली जिल्ह्यातील या भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक कर्तव्य बजावण्यास तयार होत नाही.शिक्षकांच्या यावर्षी आॅनलाईन बदल्या झाल्या. आजपर्यंत शहराजवळ राहून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना सरळ सीमावर्ती भागांमध्ये नियुक्ती देण्यात आली. तर काही शिक्षकांवर आॅनलाईन बदलीमध्ये अन्याय झाला आहे. अन्यायग्रस्त तसेच दुर्गम भागात कर्तव्य बजावण्याची इच्छा नसलेल्या काही शिक्षकांनी वैद्यकीय रजेचा पर्याय अवलंबला आहे.आधीच गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दोन शिक्षकी शाळांमध्ये एका शिक्षकाची नियुक्ती करून शाळा चालविली जात आहे. एका शिक्षकाला प्रशासकीय कामे, चार वर्गांना अध्यापन करावे लागत आहे. एखादे दिवशी प्रशासकीय काम आल्यास शाळा बंद ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा स्थितीत इच्छित शाळा न मिळाल्याचे कारण पुढे करून काही शिक्षकांनी वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची आणखी टंचाई निर्माण झाली आहे. ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत कर्तव्याच्या ठिकाणी रूजू व्हावे. सात दिवसांमध्ये जे शिक्षक कर्तव्यस्थळी रूजू होणार नाहीत, त्यानंतर त्यांना गट शिक्षणाधिकाºयांनी परस्पर रूजू करून न घेता वैद्यकीय मंडळाकडे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता निर्देशीत करावे. आजारी नसल्याचे सिध्द झाल्यास तसेच खोट्या कारणावरून रजेवर गेल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षकांवर बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा परिपत्रकातून दिला आहे. या परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.गट शिक्षणाधिकाऱ्यांनाही इशारासात दिवसांच्या आत जे शिक्षक स्वत:हून कर्तव्यावर रूजू होणार नाहीत, अशा शिक्षकांना नंतर गट शिक्षणाधिकारी यांनी रूजू करून घेऊ नये. संबंधित शिक्षकांना वैद्यकीय मंडळाकडेच पाठवावे. त्यांना वैद्यकीय मंडळाकडे हजर न केल्यास पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाºयांनाच जबाबदार धरण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे गट शिक्षणाधिकाºयांनी संबंधित शिक्षकांना फोन करून याबाबतची माहिती दिली जात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली