शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीची हिंसा संपतेय, पण शहरी माओवादाचे आव्हान

By संजय तिपाले | Updated: July 22, 2025 16:16 IST

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता : विदेशातून फंडिंग होत असल्याचा दावा

गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोलीचा वेगाने विकास होत आहे, उद्योग येत आहेत, आदिवासी, अठरापगड लोकांचे जीवनमान बदलत आहे, पण काही लोकांच्या डोळ्यांत प्रगती खुपत आहे. जंगलातील बंदुकीची हिंसा संपत असली तरी शहरी माओवादाचे आव्हान निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर मोहीम चालवून गडचिरोलीबाबत दिशाभूल केली जात असून यासाठी विदेशातून फंडिंग होत असल्याचा दावा मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कोनसरी (ता. चामोर्शी) येथे लॉयडस मेटल्स अँड एनर्जी लि. च्या वतीने ४.५ एमटीपीए क्षमतेच्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्प, कोनसरी येथे १०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय, सीबीएसई पद्धतीची शाळेचे भूमिपूजन, सोमनपल्ली येथे  कर्मचारी वसाहतीचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार  परिणय फुके , आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, पद्मश्री तुलसी मुंडा, व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे , माजी जिल्हाध्यक्ष  प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार , पोलिस महानिरीक्षक (अभियान) संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग सुरू करण्यात आला. २०१५ पासून आतापर्यंत कंपनीने हिंमतीने पाऊल ठेवले त्यामुळे आज या भागातील गरीब आदिवासी व अठरापगड जातीच्या लोकांचे आयुष्य बदलत आहे. जल, जंगल, जमीन अबाधित राखून विकास करायचा, इथल्या खनिजावर इथेच प्रक्रिया करून स्वस्त आणि दर्जेदार पोलाद निर्माण करायचे अशी अट घातली होती. रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याचे धोरण आहे. त्यामुळे या भागाचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, गेल्यावेळी पायाभरणी कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर गरीब आदिवासींना मारले, त्यांच्या जमिनी बळकावल्या, त्यांच्यावर अन्याय केला अशा आशयाच्या पोस्ट प्रसारित करून प्रपोगंडा निर्माण करण्यात आला, असे फडणवीस यांनी सांगितले.  लोकांना भ्रमित करणारे दोघे कोलकाता तर दोघे बंगळुरूचे 

जंगलात बोटावर मोजण्याइतके नक्षल शिल्लक आहेत, त्यांनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले, जंगलातील माओवाद संपत असला तरी शहरी नक्षलवादाचे आव्हान निर्माण झाले असल्याचे सांगून त्यांनी चिंता व्यक्त केली. गडचिरोलीत सुरू असलेल्या विकासाबाबत लोकांना भ्रमित करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेतला असता त्यातील दोघे कोलकाता तर दोघे बंगळुरूचे असल्याचे समोर आले. त्यांना विदेशातून फंडिंग होत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. मात्र, लोकशाही राज्यात अशा प्रकारे संविधान विरोधी काम करणाऱ्यांना कुठेही थारा नाही, त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे दुर्दैवी विधिमंडळात ऑनलाइन जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पिकविण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. शेतकरी नव्हे शासन भिकारी असल्याच्या कोकाटे यांच्या कथित वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की त्यांचे विधान मी पाहिले नाही, पण ते असे काही बोलले असतील तर ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGadchiroliगडचिरोली