शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
3
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
4
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
5
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
6
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
7
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
8
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
9
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
10
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
11
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
12
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
13
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
14
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
15
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
16
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
17
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
18
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
19
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
20
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
Daily Top 2Weekly Top 5

कव्हरेज गूल

By admin | Updated: May 20, 2014 23:40 IST

महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर टॉवरला विद्युत पुरवठा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या बहुतांश बॅटरीज नादुरूस्त आहेत. त्याचबरोबर आकस्मिक स्थितीत विजेचा पुरवठा

दूरध्वनीसेवा ठप्प : बॅटर्‍या नादुरूस्त; डिझेलही नाही

गडचिरोली : महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर टॉवरला विद्युत पुरवठा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या बहुतांश बॅटरीज नादुरूस्त आहेत. त्याचबरोबर आकस्मिक स्थितीत विजेचा पुरवठा करण्यासाठी असलेले जनरेटरही डिझेलअभावी बंद असल्याने वीज पुरवठा खंडीत होताच ग्रामीण भागातील कव्हरेजही गुल होत आहे. मोबाईल हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. त्यामुळे व्यक्ती तेवढे मोबाईल सध्या दिसून येतात. शहरी भागासह ग्रामीण भागातही मोबाईल धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जेवढे जास्त मोबाईलधारक तेवढा जास्त नफा हे सरळ आर्थिक समीकरण असल्याने मोबाईल कंपन्या आपला विस्तार ग्रामीण भागातही करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) चे एकूण ८८ मोबाईल टॉवर आहेत. मोबाईल टॉवर वीज वितरण कंपनीकडून मिळणार्‍या विजेवर चालतात. एकूण ८८ टॉवरपैकी ५० पेक्षा अधिक टॉवर दुर्गम भागामध्ये आहेत. विद्युत लाईन जंगलामधूनच गेली असल्याने सोसाट्याचा वारा होताच एखादे झाड पडून विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना नेहमी घडतात. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतरही टॉवरला विजेचा पुरवठा होत राहावा. यासाठी प्रत्येक टॉवरला बॅटरीज बसविण्यात आल्या आहेत. मात्र ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही बहुतांश टॉवरमधील बॅटरीज बदलविण्यात आल्या नाहीत. यातील काही बॅटरीज नादुरूस्त आहेत तर काहींची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे या बॅटरीज व्यवस्थित काम करीत नसल्याचे दिसून येते. महावितरणसारखी लेटलतीफ कंपनी अख्ख्या राज्यात शोधुन सापडणार नाही. विशेषकरून गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर किमान दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. या नेहमीच्या बाबी झाल्या आहेत.या कालावधीत टॉवरला बॅटरीने वीज पुरवठा होऊन टॉवर सुरू राहावा, अशी अपेक्षा नागरिक करीत असला तरी बॅटरीज पुर्ण क्षमतेने काम करीत नसल्याने टॉवरला जास्तीत जास्त २ ते ३ तास विद्युत पुरवठा होऊन टॉवर सुरू राहतो. त्यानंतर बॅटरींची कार्यक्षमता पूर्णपणे संपत असल्याने टॉवरला विजेचा पुरवठा होत नाही. परिणामी त्या परिसरातील कव्हरेज काही वेळातच गायब होतो. बॅटरीज काम करणे बंद झाल्यानंतरही शेवटचा पर्याय म्हणून बहुतांश टॉवरच्या ठिकाणी बीएसएनएलतर्फे जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील काही ठिकाणचे जनरेटरही नादुरूस्त आहेत. तर काही ठिकाणी डिझेलच उपलब्ध राहत नाही. परिणामी शेवटचा पर्याय असलेला जनरेटरसुध्दा सुरू होत नाही. त्यामुळे मोबाईल टॉवर काम करणे बंद होते. वीज पुरवठा खंडीत झाल्याने गावामध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. घरी असलेली विजेवर चालणारी सर्व मनोरंजनाची व इतर साधने बंद होतात. त्यामुळे नागरिक गोंधळलेल्या स्थितीत असतांनाच अगदी काही वेळातच मोबाईलचा क व्हरेजही गायब होतो. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ अधिकच उडतो. वीज व मोबाईल या दोन बाबी जेवणापेक्षाही महत्वाच्या ठरत चालल्या आहेत. या दोन्ही बाबी गावात उपलब्ध नसल्यानंतर त्या गाववासियांना जणू ते अंदमान किंवा निकोबारच्या बेटावर किंवा एखाद्या घनदाट जंगलामध्ये राहात असल्याचा भास होतो. रात्र काढणे कठीण होऊन बसते. बीएसएनएलने या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देऊन बॅटरीज तत्काळ दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)