शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

कव्हरेज गूल

By admin | Updated: May 20, 2014 23:40 IST

महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर टॉवरला विद्युत पुरवठा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या बहुतांश बॅटरीज नादुरूस्त आहेत. त्याचबरोबर आकस्मिक स्थितीत विजेचा पुरवठा

दूरध्वनीसेवा ठप्प : बॅटर्‍या नादुरूस्त; डिझेलही नाही

गडचिरोली : महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर टॉवरला विद्युत पुरवठा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या बहुतांश बॅटरीज नादुरूस्त आहेत. त्याचबरोबर आकस्मिक स्थितीत विजेचा पुरवठा करण्यासाठी असलेले जनरेटरही डिझेलअभावी बंद असल्याने वीज पुरवठा खंडीत होताच ग्रामीण भागातील कव्हरेजही गुल होत आहे. मोबाईल हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. त्यामुळे व्यक्ती तेवढे मोबाईल सध्या दिसून येतात. शहरी भागासह ग्रामीण भागातही मोबाईल धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जेवढे जास्त मोबाईलधारक तेवढा जास्त नफा हे सरळ आर्थिक समीकरण असल्याने मोबाईल कंपन्या आपला विस्तार ग्रामीण भागातही करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) चे एकूण ८८ मोबाईल टॉवर आहेत. मोबाईल टॉवर वीज वितरण कंपनीकडून मिळणार्‍या विजेवर चालतात. एकूण ८८ टॉवरपैकी ५० पेक्षा अधिक टॉवर दुर्गम भागामध्ये आहेत. विद्युत लाईन जंगलामधूनच गेली असल्याने सोसाट्याचा वारा होताच एखादे झाड पडून विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना नेहमी घडतात. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतरही टॉवरला विजेचा पुरवठा होत राहावा. यासाठी प्रत्येक टॉवरला बॅटरीज बसविण्यात आल्या आहेत. मात्र ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही बहुतांश टॉवरमधील बॅटरीज बदलविण्यात आल्या नाहीत. यातील काही बॅटरीज नादुरूस्त आहेत तर काहींची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे या बॅटरीज व्यवस्थित काम करीत नसल्याचे दिसून येते. महावितरणसारखी लेटलतीफ कंपनी अख्ख्या राज्यात शोधुन सापडणार नाही. विशेषकरून गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर किमान दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. या नेहमीच्या बाबी झाल्या आहेत.या कालावधीत टॉवरला बॅटरीने वीज पुरवठा होऊन टॉवर सुरू राहावा, अशी अपेक्षा नागरिक करीत असला तरी बॅटरीज पुर्ण क्षमतेने काम करीत नसल्याने टॉवरला जास्तीत जास्त २ ते ३ तास विद्युत पुरवठा होऊन टॉवर सुरू राहतो. त्यानंतर बॅटरींची कार्यक्षमता पूर्णपणे संपत असल्याने टॉवरला विजेचा पुरवठा होत नाही. परिणामी त्या परिसरातील कव्हरेज काही वेळातच गायब होतो. बॅटरीज काम करणे बंद झाल्यानंतरही शेवटचा पर्याय म्हणून बहुतांश टॉवरच्या ठिकाणी बीएसएनएलतर्फे जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील काही ठिकाणचे जनरेटरही नादुरूस्त आहेत. तर काही ठिकाणी डिझेलच उपलब्ध राहत नाही. परिणामी शेवटचा पर्याय असलेला जनरेटरसुध्दा सुरू होत नाही. त्यामुळे मोबाईल टॉवर काम करणे बंद होते. वीज पुरवठा खंडीत झाल्याने गावामध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. घरी असलेली विजेवर चालणारी सर्व मनोरंजनाची व इतर साधने बंद होतात. त्यामुळे नागरिक गोंधळलेल्या स्थितीत असतांनाच अगदी काही वेळातच मोबाईलचा क व्हरेजही गायब होतो. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ अधिकच उडतो. वीज व मोबाईल या दोन बाबी जेवणापेक्षाही महत्वाच्या ठरत चालल्या आहेत. या दोन्ही बाबी गावात उपलब्ध नसल्यानंतर त्या गाववासियांना जणू ते अंदमान किंवा निकोबारच्या बेटावर किंवा एखाद्या घनदाट जंगलामध्ये राहात असल्याचा भास होतो. रात्र काढणे कठीण होऊन बसते. बीएसएनएलने या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देऊन बॅटरीज तत्काळ दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)