शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पिकांबाबत मार्गदर्शन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : खरीप हंगामाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागातील कर्मचाºयांनी शेतकºयांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.२०१९-२० च्या खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती जाणून घेण्यासाठी शुक्रवारी आढावा सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, लिड बँकेचे व्यवस्थापक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी खात्याने अधिक प्रयत्न करावेत. प्रत्येक शेतकºयांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचेल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. कलापथक, पत्रके, माध्यमे आदींच्या माध्यमातून जनजागृती करावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले. जिल्ह्यात यावर्षी हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. सोयाबिनच्या तुलनेत शेतकरी कापूस पिकाला पसंती दर्शवित असल्याने याही वर्षी कापसाचे लागवड क्षेत्र वाढणार आहे.अपघात विम्याची २७ प्रकरणे प्रलंबितराज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा राबवित आहे. या योजनेंतर्गत शेतकºयाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाख रुपयांचा विमा दिला जातो. २०१५-१६ या वर्षापासून शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मागील वर्षात १५१ प्रस्ताव प्राप्त झाले. हे सर्व प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. कंपनीने ५८ प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या वारसांना विमा रक्कम दिली. ३३ प्रस्ताव नामंजूर केले तर २७ प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत, अशी माहिती कृषी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी