शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Encounter In Gadchiroli : 'ही देशातील मोठी कारवाई, पोलिसांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 14:08 IST

ही गेल्या वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई असून राज्यातीलच नव्हे तर देशासाठीही मोठी बाब आहे. याबाबत, मुख्यमंमत्र्याशी चर्चा करून पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना बक्षिस दिले जाणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात राबण्यात येणाऱ्या अभियानाला आज मोठं यश मिळालं आहे. या चकमकीत २६ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे आणि महेश गोटा मारले गेले आहेत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच कौतुक केलं आहे.

महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर असलेल्या कोटगुल ग्यारापत्ती जंगलात सी ६० कमांडोंनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. झालेल्या नक्षल आणि पोलिसांच्या चकमकीची माहिती देताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या चकमकीत २६ नक्षली मारले गेले आहेत. तसेच, नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेलाही ठार मारण्यात आले आहे. त्याच्यावर ५० लाखांचे बक्षीस होते. ही गेल्या वर्षभरातली राज्यातीलच नव्हे तर देशातील मोठी कारवाई असून महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठीही मोठी बाब आहे. त्याठिकाणी जावून पोलीस आणि जवानांची भेट घेणार आहेत. यासोबतच, मुख्यमंमत्र्याशी चर्चा करून पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना बक्षिस दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

सुमारे ९ ते १० तास ही चकमक सुरू होती. यामध्ये पोलिसांचे चार  जवान जखमी झाले. त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, असंही शिंदे म्हणाले.

आम्हाला गडचिरोलीचा विकास करायचा आहे. त्या भागाचा विकास आम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे. जिल्ह्यात विकासकामेही सुरू झाली आहेत, असं त्यांनी सांगितलं. मला धमकी देणारा यात मारला गेलाय का याचा तपास पोलीस आणि गृहविभाग करीत आहे. अशा धमक्या अनेकवेळा आल्या आहेत. त्याला मी घाबरलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीEknath Shindeएकनाथ शिंदेPoliceपोलिस