शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

कारमेल विरोधात पालक आक्रमक

By admin | Updated: April 16, 2016 00:52 IST

विद्यार्थी व पालकांना मिळणारी अपमानजनक वागणूक तसेच शिक्षण शुल्क वाढीच्या मुद्यावरून देसाईगंज येथील कारमेल अ‍ॅकॅडमी प्रशासनाच्या विरोधात ...

पालकांनी घेतली बैठक : देसाईगंज येथील वातावरण तापलेदेसाईगंज : विद्यार्थी व पालकांना मिळणारी अपमानजनक वागणूक तसेच शिक्षण शुल्क वाढीच्या मुद्यावरून देसाईगंज येथील कारमेल अ‍ॅकॅडमी प्रशासनाच्या विरोधात परिसरातील ३०० वर पालकांनी येथील आरमोरी मार्गावरील फारेस्ट गार्डनवर एकत्र येऊन शुक्रवारी सभा घेतली. कारमेल शाळा प्रशासनाने पालकांच्या मागण्या पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणत्र सामुहिकरित्या काढण्यात येईल, असे एकमताने ठरविण्यात आले. या सभेला कारमेल शाळा पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बन्सोड, उपाध्यक्ष डॉ. महेश पापडकर, प्रफुल वढे, क्रिष्णा कोडापे, सुभाष गहाणे, सुरेश साधवानी, चंदा राऊत आदींसह ३०० वर पालक उपस्थित होते. आमगाव-देसाईगंज येथील कारमेल अ‍ॅकॅडमी प्रशासनाकडून पालकांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जात आहे. या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कम अदा करण्यास पालकांकडून विलंब झाल्यास कार्यरत शिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांना बळजबरीची शिक्षा दिली जाते, याला पालकांनी विरोध केल्यास प्रशासनाकडून त्रासही दिल्या जातो, प्रत्येक वर्षी मर्जीने शिक्षण शुल्काची रक्कम पालकांकडून वसूल केली जाते. कित्येकदा अर्धा तास विद्यार्थ्यांना दंड बैठका लावण्याची शिक्षाही दिली जाते, अशा अनेक तक्रारी बैठकीत या पालकांनी बोलून दाखविल्या.दरवर्षी विद्यार्थ्यांना कारमेल अ‍ॅकॅडमी शाळेतून पुस्तके खरेदी करावे लागतात. शिवाय पुस्तकांवर छापील किंमतीपेक्षा दुप्पट भावाने रक्कम अदा करावी लागते. तक्रारी वा विविध प्रश्नांसंदर्भात प्राचार्यांना विचारणा केल्यास त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, असाही आरोप पालकांनी केला आहे. अखेर त्रस्त झालेल्या पालकांनी कारमेल अ‍ॅकॅडमी प्रशासनाच्या विरोधात पालक संघर्ष समितीची स्थापना करून लढा देण्याचे सभेत ठरविले. यासंदर्भात कारमेल अ‍ॅकॅडमीचे प्राचार्य अगेस्टिन येचुरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली असता, सध्या आपण केरळमध्ये आहोत, मी देसाईगंजमध्ये पोहोचल्यानंतर या प्रकाराबाबत आपणाला सविस्तर माहिती देईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर) शनिवारी आंदोलन करणारकारमेल अ‍ॅकॅडमी प्रशासनाच्या विरोधात पालक शनिवारी शाळेवर मोर्चा काढून आंदोलन करणार आहेत, अशी माहिती बैठकीनंतर अनेक पालकांनी दिली. या आंदोलनादरम्यान पालकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्राचार्यांशी चर्चाही करण्यात येणार आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांच्या टीसी काढण्याचाही पवित्रा पालकांनी घेतला आहे.