शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यातून साधली उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:43 IST

निसर्गाने साथ दिली तर शेतकरी जगला, निसर्ग कोपला तर शेतकरी संपला या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायात नफा-तोट्याची वस्तूस्थिती असतानाही याही पुढे जाऊन रामपूर येथील एका शेतकऱ्यांने चार एकरात चवळीच्या शेंगा, कोबी व अन्य भाजीपाल्याची लागवड केली आहे.

ठळक मुद्देरामपुरात चार एकरात लागवड : शेतकऱ्याने अनेक मजुरांनाही दिला रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : निसर्गाने साथ दिली तर शेतकरी जगला, निसर्ग कोपला तर शेतकरी संपला या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायात नफा-तोट्याची वस्तूस्थिती असतानाही याही पुढे जाऊन रामपूर येथील एका शेतकऱ्यांने चार एकरात चवळीच्या शेंगा, कोबी व अन्य भाजीपाल्याची लागवड केली आहे. यातून शेतकऱ्याने स्वत:ची तर आर्थिक उन्नती साधली. शिवाय गावातील १५ ते २० मजुरांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.रामपूर येथील प्रगतशील शेतकरी सुधाकर खरकाटे यांनी गाढवी नदी काठावर असलेल्या स्वत:च्या चार एक शेतजमिनीवर सुरुवातीला सिंचनाची व्यवस्था करण्याकरिता नदीमध्ये मोटारपंप बसविला. शेतात विविध प्रजातींच्या आंब्याची रोपे लावली. जवळपास १५ झाडे सध्या मोठी झाली असून दरवर्षी हजारो रूपयांची उत्पादन ते देत आहेत. गेल्या १० वर्षापासून चार एकर जागेत चवळी, कोबी, वांगी, भेंटी, कारले, टमाटर, मिरची तर काही जागेत मक्का असा विविध प्रकारचा भाजीपाला व पिके शेतकरी खरकाटे घेत आहेत. शेतात भाजीपाला लागवड करणे, कोडकी करणे, भाजीपाला तोडणे या कामाकरिता नियमित १५ ते २० महिला खरकाटे यांच्याकडे कामाला असतात. त्यामुळे गावातील मजुरांना रोजगार मिळाला आहे.भाजीपाल्याच्या हंगामात दररोज तीन ते चार क्विंटल भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. शासन रोजगार देण्याकरिता कमी पडत असले तरी शेतकरी गावातील मजुरांना वर्षभर रोजगार देत आहे. शिवाय आपली आर्थिक उन्नतीही साधत आहे. खरकाटे यांची ही शेती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी