शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

जलसंधारणाने भूजल पातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:07 IST

चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव परिसरात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुमारे दीड मिटरने वाढ झाली असून शेतशिवारातील विहिरी अगदी काठोकाठ भरल्या आहेत.

ठळक मुद्देजैरामपूर गावाची यशोगाथा : ४८ बोड्यांची केली दुरूस्ती; ६१ विहिरींचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव परिसरात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुमारे दीड मिटरने वाढ झाली असून शेतशिवारातील विहिरी अगदी काठोकाठ भरल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.२०१६-१७ या वर्षात जैरामपूर गावाची निवड करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर हे गाव शेतीच्या दृष्टीने अग्रगण्य असलेले गाव आहे. या गावात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन, भाजीपाला तर रब्बी हंगामात कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जातात. उन्हाळी हंगामात सुद्धा काही शेतकरी भाजीपाल्याची पिके घेतात. गावाची लोकसंख्या १ हजार ५५४ एवढी असून गावात पाळीव प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र ५६५.१९ हेक्टर एवढे असून लागवडीखालील क्षेत्र ४६१.१७ हेक्टर एवढे आहे. शेतीसाठी ९९०.२५ टीएमसी व मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी ४२.५९ टीएमसी म्हणजेच एकंदरीत जैरामपूर गावासाठी १०३२.८४ टीएमसी पाण्याची गरज होती. मात्र गावाला ८७४.२८ टीएमसी एवढाच पाणी उपलब्ध होत असल्याने २५८.३१ टीएमसी एवढ्या पाण्याचा तुटवडा निर्माण होत होता.हा तुटवडा भरून काढण्यासाठी कृषी विभागाच्या मार्फतीने शिवार फेरीअंतर्गत गाव परिसराचे निरीक्षण करून जलसंधारणाची काम केली. तीन जुन्या सिमेंट नाल्यांची दुरूस्ती, नाला खोलीकरण, ४८ बोड्यांची दुरूस्ती व ६१ नवीन विहिरी बांधल्या. त्यामुळे जलसंधारण वाढून २५८.३१ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला व गावाची तसेच शेतीसाठी पाण्याची गरज सुद्धा पुरविण्यास मदत झाली.पाणीटंचाईतून गावाची होणार मुक्तीजैरामपूर गावात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नियोजनबद्ध कामे केली जात आहेत. यावर्षी आवश्यक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.गावात जलसंधारणाची कामे करण्यास जैरामपूरचे सरपंच अंकुश शेडमाके, उपसरपंच हरीश निकाडे, प्रगतशील शेतकरी भाऊजी दिवसे, सुधाकर तोटपल्लीवार, गुरूदास आभारे, कृषी मित्र सुधाकर राऊत यांनी पुढाकार घेतला.जैरामपूर गाव परिसरात सुमारे ८० बोड्या आहेत. यापैकी ६१ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. धानाला सिंचन उपलब्ध करून देण्यात या बोड्या अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. दुरूस्तीमुळे बोड्यांची सिंचन क्षमता वाढली आहे. त्यामुळे या वर्षी धानपिकास शेवटपर्यंत पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे.