शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जलसंधारणाने भूजल पातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:07 IST

चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव परिसरात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुमारे दीड मिटरने वाढ झाली असून शेतशिवारातील विहिरी अगदी काठोकाठ भरल्या आहेत.

ठळक मुद्देजैरामपूर गावाची यशोगाथा : ४८ बोड्यांची केली दुरूस्ती; ६१ विहिरींचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव परिसरात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुमारे दीड मिटरने वाढ झाली असून शेतशिवारातील विहिरी अगदी काठोकाठ भरल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.२०१६-१७ या वर्षात जैरामपूर गावाची निवड करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर हे गाव शेतीच्या दृष्टीने अग्रगण्य असलेले गाव आहे. या गावात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन, भाजीपाला तर रब्बी हंगामात कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जातात. उन्हाळी हंगामात सुद्धा काही शेतकरी भाजीपाल्याची पिके घेतात. गावाची लोकसंख्या १ हजार ५५४ एवढी असून गावात पाळीव प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र ५६५.१९ हेक्टर एवढे असून लागवडीखालील क्षेत्र ४६१.१७ हेक्टर एवढे आहे. शेतीसाठी ९९०.२५ टीएमसी व मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी ४२.५९ टीएमसी म्हणजेच एकंदरीत जैरामपूर गावासाठी १०३२.८४ टीएमसी पाण्याची गरज होती. मात्र गावाला ८७४.२८ टीएमसी एवढाच पाणी उपलब्ध होत असल्याने २५८.३१ टीएमसी एवढ्या पाण्याचा तुटवडा निर्माण होत होता.हा तुटवडा भरून काढण्यासाठी कृषी विभागाच्या मार्फतीने शिवार फेरीअंतर्गत गाव परिसराचे निरीक्षण करून जलसंधारणाची काम केली. तीन जुन्या सिमेंट नाल्यांची दुरूस्ती, नाला खोलीकरण, ४८ बोड्यांची दुरूस्ती व ६१ नवीन विहिरी बांधल्या. त्यामुळे जलसंधारण वाढून २५८.३१ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला व गावाची तसेच शेतीसाठी पाण्याची गरज सुद्धा पुरविण्यास मदत झाली.पाणीटंचाईतून गावाची होणार मुक्तीजैरामपूर गावात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नियोजनबद्ध कामे केली जात आहेत. यावर्षी आवश्यक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.गावात जलसंधारणाची कामे करण्यास जैरामपूरचे सरपंच अंकुश शेडमाके, उपसरपंच हरीश निकाडे, प्रगतशील शेतकरी भाऊजी दिवसे, सुधाकर तोटपल्लीवार, गुरूदास आभारे, कृषी मित्र सुधाकर राऊत यांनी पुढाकार घेतला.जैरामपूर गाव परिसरात सुमारे ८० बोड्या आहेत. यापैकी ६१ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. धानाला सिंचन उपलब्ध करून देण्यात या बोड्या अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. दुरूस्तीमुळे बोड्यांची सिंचन क्षमता वाढली आहे. त्यामुळे या वर्षी धानपिकास शेवटपर्यंत पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे.