शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाने भूजल पातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:07 IST

चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव परिसरात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुमारे दीड मिटरने वाढ झाली असून शेतशिवारातील विहिरी अगदी काठोकाठ भरल्या आहेत.

ठळक मुद्देजैरामपूर गावाची यशोगाथा : ४८ बोड्यांची केली दुरूस्ती; ६१ विहिरींचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव परिसरात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुमारे दीड मिटरने वाढ झाली असून शेतशिवारातील विहिरी अगदी काठोकाठ भरल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.२०१६-१७ या वर्षात जैरामपूर गावाची निवड करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर हे गाव शेतीच्या दृष्टीने अग्रगण्य असलेले गाव आहे. या गावात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन, भाजीपाला तर रब्बी हंगामात कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जातात. उन्हाळी हंगामात सुद्धा काही शेतकरी भाजीपाल्याची पिके घेतात. गावाची लोकसंख्या १ हजार ५५४ एवढी असून गावात पाळीव प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र ५६५.१९ हेक्टर एवढे असून लागवडीखालील क्षेत्र ४६१.१७ हेक्टर एवढे आहे. शेतीसाठी ९९०.२५ टीएमसी व मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी ४२.५९ टीएमसी म्हणजेच एकंदरीत जैरामपूर गावासाठी १०३२.८४ टीएमसी पाण्याची गरज होती. मात्र गावाला ८७४.२८ टीएमसी एवढाच पाणी उपलब्ध होत असल्याने २५८.३१ टीएमसी एवढ्या पाण्याचा तुटवडा निर्माण होत होता.हा तुटवडा भरून काढण्यासाठी कृषी विभागाच्या मार्फतीने शिवार फेरीअंतर्गत गाव परिसराचे निरीक्षण करून जलसंधारणाची काम केली. तीन जुन्या सिमेंट नाल्यांची दुरूस्ती, नाला खोलीकरण, ४८ बोड्यांची दुरूस्ती व ६१ नवीन विहिरी बांधल्या. त्यामुळे जलसंधारण वाढून २५८.३१ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला व गावाची तसेच शेतीसाठी पाण्याची गरज सुद्धा पुरविण्यास मदत झाली.पाणीटंचाईतून गावाची होणार मुक्तीजैरामपूर गावात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नियोजनबद्ध कामे केली जात आहेत. यावर्षी आवश्यक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.गावात जलसंधारणाची कामे करण्यास जैरामपूरचे सरपंच अंकुश शेडमाके, उपसरपंच हरीश निकाडे, प्रगतशील शेतकरी भाऊजी दिवसे, सुधाकर तोटपल्लीवार, गुरूदास आभारे, कृषी मित्र सुधाकर राऊत यांनी पुढाकार घेतला.जैरामपूर गाव परिसरात सुमारे ८० बोड्या आहेत. यापैकी ६१ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. धानाला सिंचन उपलब्ध करून देण्यात या बोड्या अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. दुरूस्तीमुळे बोड्यांची सिंचन क्षमता वाढली आहे. त्यामुळे या वर्षी धानपिकास शेवटपर्यंत पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे.