शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

भूजल पातळी अर्ध्या मीटरने खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:45 IST

भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी अर्धा मीटरने खोल गेली आहे. दरवर्षीच पाणी पातळी खोल जात असल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे११२ विहिरींची पाहणी : सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विभागाचे असेही निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी अर्धा मीटरने खोल गेली आहे. दरवर्षीच पाणी पातळी खोल जात असल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात १३०० मिमी पाऊस पडते. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. पर्जन्यमान अधिक असल्याने पाणी पातळीही वरच राहत होती. जास्तीत जास्त मे महिन्यात थोडीफार पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. मात्र मागील काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातही बोअर मारले जात आहेत. बोअर हे १०० ते २०० फुटापर्यंत राहतात. बोअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. सिंचन विहिरींच्या माध्यमातूनही पाणी उपसा होत आहे. मात्र पाणी साठून राहिल, यासाठी उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.भूजल पातळी मोजण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभाग करतो. यासाठी बाराही तालुक्यात ११२ विहिरी ठरविण्यात आले आहेत. या विहिरींच्या निरिक्षणातून पाणी पातळीबाबतचा अंदाज बांधला जातो. मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण केले होते. यामध्ये आरमोरी व मुलचेरा तालुक्यात भूजल पातळी सर्वाधिक ०.६३ मीटरने खोल गेली आहे. धानोरा तालुक्याची भूजल पातळी ०.६१ मीटर, गडचिरोली ०.४३ मीटर, देसाईगंज ०.६० मीटर, अहेरी ०.३२ मीटर, एटापल्ली ०.३० मीटर, भामरागड ०.१३ मीटरने घटली आहे. दरवर्षी जवळपास अर्धा मीटरने भूजल पातळी घटत असल्याने ही भविष्यात धोक्याची घंटा ठरणारी आहे.बोअर खोल खोदण्याची स्पर्धा थांबायला हवीजमिनीत एका विशिष्ट पातळीपर्यंत पाणी मिळते. त्यानंतर पाणी मिळत नाही. त्यामुळे जेवढे खोल खोदू तेवढे पाणी अधिक मिळेल, हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. सद्य:स्थितीत विहिरींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास विहिरी पूर्णपणे कोरड्या पडतील व हळूहळू १०० फुट खोल खोदलेल्या हातपंपातूनही पाणी येणार नाही. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. तसेच जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरेल, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई