शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांचा मोर्चा धानोरा तहसील कार्यालयावर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:06 IST

विविध मागण्यांसाठी धानोरा तालुक्यातील ग्रामसभांनी तालुका ग्रामसभा महासंघाच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.

ठळक मुद्देतहसीलदारांनी स्वीकारले निवेदन : पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा मोर्चात सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : विविध मागण्यांसाठी धानोरा तालुक्यातील ग्रामसभांनी तालुका ग्रामसभा महासंघाच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते.मोर्चाचे नेतृत्व आदिवासी सेवक महासंघाचे अध्यक्ष देवाजी तोफा यांनी केले. सदर मोर्चा मॉ दंतेश्वरी मंदिरापासून निघून मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात जवळपास पाच हजार नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व देवाजी तोफा, बाजीराव नरोटे, जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटे, माजी जि.प. सदस्य शांताबाई परसा, देवा कड्यामी, शिवराम उसेंडी, प्रफुल किरंगे, सीताराम उसेंडी, परसराम पदा, दानसू तोफा, देविदास पदा, ईश्वर कुमरे, विलास पोरेटी, मनोहर गुरनुले, गणेश मडावी, गणजू जांगी, प्रकाश कोवे, मनसराम कोवे, महारू परसा, मंगेश आतला, काशीराम नरोटे, मनू धुर्वे, दशरथ पुंगाटे यांनी केले. तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी येऊन निवेदन स्वीकारले. सदर मागण्या शासनाकडे पाठविल्या जातील. तयासाठी तहसील कार्यालयाच्या मार्फतीने पाठपुरवा केला जाईल, असे आश्वासन दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, पोलीस निरिक्षक विजय पुराणिक, पीएसआय नावले, पीएसआय मुंडे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या मोर्चात धानोरा इलाका, दुधमाळा इलाका, झाडापापडा इलाका, खुटगाव इलाका, जांभळी इलाका, मुरूमगाव इलाका, खांबाडा, सुरसुंडी, रांगी इलाक्यातील नागरिक सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्याजिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सुरजागड व झेंडेपार प्रकल्प सुरू करण्यापूर्वी शासनाने जैवविविधता व त्यातून मिळणारे नैसर्गिक उत्पन्न किती, या प्रकल्पांमधून स्थानिक नागरिकांना किती रोजगार उपलब्ध होईल याचा विचार करावा, सिंचन पंपांना वीज जोडणी ताबडतोब उपलब्ध करून द्यावी, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या, पेसा अंतर्गत येणाºया गावातील वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीत आरक्षणानुसार स्थानिकांना प्राधान्य द्यावे, जिल्ह्यात यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, सामुदायीक वैयक्तिक पट्टे सातबारासह द्यावेत, आदिवासी गावांमधून एखाद्याला अटक करताना ग्रामसभेची परवानगी घेणे सक्तीचे करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.