शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचे जि. प.समोर उपोषण

By admin | Updated: April 6, 2017 01:27 IST

ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित दराने किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात यावा आदी

रखडलेले मानधन त्वरित देणार : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन गडचिरोली : ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित दराने किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात यावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनतर्फे जिल्हा परिषदेसमोर बुधवारी आमरण उपोषण करण्यात आले. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसाठी शासनाने किमान वेतन ५ हजार १०० ते ७ हजार १०० रूपये तसेच २ हजार ५०० रूपये राहणीमान भत्ता निर्धारित केला आहे. मात्र ग्राम पंचायत या नियमांचे पालन करीत नाही. प्रत्यक्षात यापेक्षा अर्धेच मानधन ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना दिले जाते. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी जिल्हा परिषदेकडे शासनाकडून ३ आॅक्टोबर २०१६, एप्रिल २०१६ व डिसेंबर २०१६ पर्यंतचे अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत किमान वेतनाचा निधी ग्राम पंचायत स्तरावर वितरित केला नाही. त्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना मागील एक वर्षापासून वेतन मिळाले नाही. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची सेवापुस्तीका अद्यावत करण्यात याव्या, भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करण्यात यावी, अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्केच्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या सेवेत नियुक्ती करावी, आदी मागण्यांसाठी ५ एप्रिलपासून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषणकर्त्यांशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम धनकर यांनी चर्चा केली व त्यांनी रखडलेले मानधन तत्काळ देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेच्या वतीने उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. उपोषणाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनचे राज्यध्यक्ष विलास कुमरवार, प्रभाकर पस्पुनुरवार, रहिम खॉ पठाण, सुभाष बाच्छाड, सचिन गोमस्ता, बुडनशाह अली, मारोती करमे, विनोद तलांडे, दिलीप सिडाम, रेणुका पाईक, हर्षा मेश्राम, बाबुराव बावणे यांनी केले. आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)