शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचे जि. प.समोर उपोषण

By admin | Updated: April 6, 2017 01:27 IST

ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित दराने किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात यावा आदी

रखडलेले मानधन त्वरित देणार : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन गडचिरोली : ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित दराने किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात यावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनतर्फे जिल्हा परिषदेसमोर बुधवारी आमरण उपोषण करण्यात आले. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसाठी शासनाने किमान वेतन ५ हजार १०० ते ७ हजार १०० रूपये तसेच २ हजार ५०० रूपये राहणीमान भत्ता निर्धारित केला आहे. मात्र ग्राम पंचायत या नियमांचे पालन करीत नाही. प्रत्यक्षात यापेक्षा अर्धेच मानधन ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना दिले जाते. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी जिल्हा परिषदेकडे शासनाकडून ३ आॅक्टोबर २०१६, एप्रिल २०१६ व डिसेंबर २०१६ पर्यंतचे अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत किमान वेतनाचा निधी ग्राम पंचायत स्तरावर वितरित केला नाही. त्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना मागील एक वर्षापासून वेतन मिळाले नाही. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची सेवापुस्तीका अद्यावत करण्यात याव्या, भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करण्यात यावी, अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्केच्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या सेवेत नियुक्ती करावी, आदी मागण्यांसाठी ५ एप्रिलपासून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषणकर्त्यांशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम धनकर यांनी चर्चा केली व त्यांनी रखडलेले मानधन तत्काळ देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेच्या वतीने उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. उपोषणाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनचे राज्यध्यक्ष विलास कुमरवार, प्रभाकर पस्पुनुरवार, रहिम खॉ पठाण, सुभाष बाच्छाड, सचिन गोमस्ता, बुडनशाह अली, मारोती करमे, विनोद तलांडे, दिलीप सिडाम, रेणुका पाईक, हर्षा मेश्राम, बाबुराव बावणे यांनी केले. आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)