शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींना मिळेना महिला पदाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:31 IST

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १८७ ग्रामंचायतमधील सरपंच-सदस्यांच्या ३९२ जागा रिक्त आहेत. यातील ९५ टक्के जागा महिलांसाठी राखीव असलेल्या आहेत.

ठळक मुद्देसरपंच-सदस्यांच्या ३९२ जागा रिक्त

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंचायत राज व्यवस्थेत गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींची भूमिका महत्वाची असते. परंतु गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १८७ ग्रामंचायतमधील सरपंच-सदस्यांच्या ३९२ जागा रिक्त आहेत. यातील ९५ टक्के जागा महिलांसाठी राखीव असलेल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी ग्रामपंचायतींच्या कारभारात महिलांचा सहभाग अजूनही नगण्य आहे हेच यावरून स्पष्ट होते.जिल्ह्यात ४५६ ग्रामपंचायती आहेत. किमान ७ ते कमाल १७ सदस्यांच्या या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका टप्प्याटप्प्याने होत असतात. परंतू बहुतांश महिला राखीव जागांसाठी आतापर्यंत संबंधित प्रवर्गाच्या महिला उमेदवारच मिळालेल्या नाहीत. परिणामी त्या जागा रिक्त आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या ५० टक्केपेक्षाही कमी जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांऐवजी प्रशासक बसविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांचे प्राबल्य आहे. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या कोणत्याही निवडणुकांना नक्षलवाद्यांचा विरोध असतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणी सहभागीच होऊ नये, अशी नक्षलवाद्यांची भूमिका असते. त्यातही गावस्तरावर वास्तव्यास असणाºया नागरिकांना नक्षलवाद्यांचा थेट विरोध पत्करणे जास्त जोखमीचे असल्याने अनेक जण इच्छा असूनही निवडणूक लढण्याच्या भानगडीत पडत नाहीत. रिक्त असणाºया जागांसाठी हे एक महत्वाचे कारण आहे.आॅक्टोबर २०१५ मध्ये ३५९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यानंतर २०१७-२०१८ मध्ये ४० ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. परंतू रिक्त असलेल्या ३९२ जागा भरणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. यातील काही जागा उमेदवाराच्या मृत्यूमुळे, नामनिर्देशन अपात्र ठरल्यामुळे, अनर्ह किंवा सदस्य-सरपंचाच्या राजीनाम्यामुळे रिक्त आहेत.विशेष म्हणजे २०१७ पूर्वी निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाचे निधन झाले किंवा त्याला अनर्ह ठरविले (अपात्र) तर आधी पोटनिवडणुकीतून सदस्यपद भरल्याशिवाय नवीन सरपंच निवडता येत नाही. त्यामुळेही अनेक ग्रामपंचायतींमधील सरपंचपद रिक्त आहे.

ही आहे महिलावर्गाची अडचणग्रामीण आणि दुर्गम भागात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. त्यानुसार बहुतांश ठिकाणचे पद त्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण आहे. परंतू राखीव प्रवर्गातून निवडणूक लढण्यासाठी जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. अशिक्षितपणामुळे किंवा त्या प्रमाणपत्राचे महत्व न कळल्यामुळे महिला वर्गाकडे हे प्रमाणपत्रच नाही. त्यामुळे त्या महिला ग्रामपंचायत निवडणुकीत नामांकनच दाखल करू शकत नाहीत.

ग्रामपंचायतींमध्ये एसटी-एससी प्रवर्गातील महिला राखीव जागा रिक्त असण्याचे प्रमाण जास्त आहे. निवडणूक लढण्यासाठी त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे. या प्रमाणपत्राचे महत्व त्यांना सांगून जास्तीत जास्त नागरिकांनी जात व पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.- एस.आर.कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारीसामान्य प्रशासन, जि.प.गडचिरोली

३० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर प्रशासकग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी सत्तारूढ होण्यासाठी सदस्यांच्या ५० टक्केपेक्षा जास्त जागा भरलेल्या असणे आवश्यक आहे. परंतू ३० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यामुळे त्या ठिकाणी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे. प्रशासक आणि ग्रामसेवकांच्या कारभारामुळे गाव विकासात गावकºयांचा सहभाग कमी झाला आहे.

टॅग्स :Governmentसरकार