शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींना मिळेना महिला पदाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:31 IST

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १८७ ग्रामंचायतमधील सरपंच-सदस्यांच्या ३९२ जागा रिक्त आहेत. यातील ९५ टक्के जागा महिलांसाठी राखीव असलेल्या आहेत.

ठळक मुद्देसरपंच-सदस्यांच्या ३९२ जागा रिक्त

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंचायत राज व्यवस्थेत गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींची भूमिका महत्वाची असते. परंतु गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १८७ ग्रामंचायतमधील सरपंच-सदस्यांच्या ३९२ जागा रिक्त आहेत. यातील ९५ टक्के जागा महिलांसाठी राखीव असलेल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी ग्रामपंचायतींच्या कारभारात महिलांचा सहभाग अजूनही नगण्य आहे हेच यावरून स्पष्ट होते.जिल्ह्यात ४५६ ग्रामपंचायती आहेत. किमान ७ ते कमाल १७ सदस्यांच्या या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका टप्प्याटप्प्याने होत असतात. परंतू बहुतांश महिला राखीव जागांसाठी आतापर्यंत संबंधित प्रवर्गाच्या महिला उमेदवारच मिळालेल्या नाहीत. परिणामी त्या जागा रिक्त आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या ५० टक्केपेक्षाही कमी जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांऐवजी प्रशासक बसविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांचे प्राबल्य आहे. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या कोणत्याही निवडणुकांना नक्षलवाद्यांचा विरोध असतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणी सहभागीच होऊ नये, अशी नक्षलवाद्यांची भूमिका असते. त्यातही गावस्तरावर वास्तव्यास असणाºया नागरिकांना नक्षलवाद्यांचा थेट विरोध पत्करणे जास्त जोखमीचे असल्याने अनेक जण इच्छा असूनही निवडणूक लढण्याच्या भानगडीत पडत नाहीत. रिक्त असणाºया जागांसाठी हे एक महत्वाचे कारण आहे.आॅक्टोबर २०१५ मध्ये ३५९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यानंतर २०१७-२०१८ मध्ये ४० ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. परंतू रिक्त असलेल्या ३९२ जागा भरणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. यातील काही जागा उमेदवाराच्या मृत्यूमुळे, नामनिर्देशन अपात्र ठरल्यामुळे, अनर्ह किंवा सदस्य-सरपंचाच्या राजीनाम्यामुळे रिक्त आहेत.विशेष म्हणजे २०१७ पूर्वी निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाचे निधन झाले किंवा त्याला अनर्ह ठरविले (अपात्र) तर आधी पोटनिवडणुकीतून सदस्यपद भरल्याशिवाय नवीन सरपंच निवडता येत नाही. त्यामुळेही अनेक ग्रामपंचायतींमधील सरपंचपद रिक्त आहे.

ही आहे महिलावर्गाची अडचणग्रामीण आणि दुर्गम भागात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. त्यानुसार बहुतांश ठिकाणचे पद त्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण आहे. परंतू राखीव प्रवर्गातून निवडणूक लढण्यासाठी जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. अशिक्षितपणामुळे किंवा त्या प्रमाणपत्राचे महत्व न कळल्यामुळे महिला वर्गाकडे हे प्रमाणपत्रच नाही. त्यामुळे त्या महिला ग्रामपंचायत निवडणुकीत नामांकनच दाखल करू शकत नाहीत.

ग्रामपंचायतींमध्ये एसटी-एससी प्रवर्गातील महिला राखीव जागा रिक्त असण्याचे प्रमाण जास्त आहे. निवडणूक लढण्यासाठी त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे. या प्रमाणपत्राचे महत्व त्यांना सांगून जास्तीत जास्त नागरिकांनी जात व पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.- एस.आर.कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारीसामान्य प्रशासन, जि.प.गडचिरोली

३० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर प्रशासकग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी सत्तारूढ होण्यासाठी सदस्यांच्या ५० टक्केपेक्षा जास्त जागा भरलेल्या असणे आवश्यक आहे. परंतू ३० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यामुळे त्या ठिकाणी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे. प्रशासक आणि ग्रामसेवकांच्या कारभारामुळे गाव विकासात गावकºयांचा सहभाग कमी झाला आहे.

टॅग्स :Governmentसरकार