शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोरोनामुळे रखडललेल्या ग्रामपंचायत निवडणुका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:55 IST

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडून चाचपणी१९ जिल्ह्यात मुदत संपली

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे. ज्या गावांमधील निवडणूक प्रक्रिया थांबली आहे त्या गावांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे याची विचारणा निवडणूक आयोगाने संबंधित जिल्ह्यांकडे केली आहे.एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यातच जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार प्रक्रियाही सुरू झाली होती. १७ मार्च रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होत असताना सदर प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत आहे त्या स्थितीत ठेवण्याचा आदेश धडकला. दरम्यान कोरोना लवकर आटोक्यात येणार नाही हे लक्षात आल्याने निवडणुकीची आचारसंहिता हटवून संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकांचीही नियुक्ती करण्यात आली.

आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश मिळाल्याने सद्यस्थितीचा अंदाज घेऊन रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचे विचाराधीन असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.आता कोणत्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे, कुठे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेशग्रामपंचायतींमधील निवडणूक प्रक्रिया अर्धवट स्थितीत थांबलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यभरातील १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा व गडचिरोली तसेच बाकी भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक