शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

राज्यात कोरोनामुळे रखडललेल्या ग्रामपंचायत निवडणुका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:55 IST

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडून चाचपणी१९ जिल्ह्यात मुदत संपली

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे. ज्या गावांमधील निवडणूक प्रक्रिया थांबली आहे त्या गावांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे याची विचारणा निवडणूक आयोगाने संबंधित जिल्ह्यांकडे केली आहे.एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यातच जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार प्रक्रियाही सुरू झाली होती. १७ मार्च रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होत असताना सदर प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत आहे त्या स्थितीत ठेवण्याचा आदेश धडकला. दरम्यान कोरोना लवकर आटोक्यात येणार नाही हे लक्षात आल्याने निवडणुकीची आचारसंहिता हटवून संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकांचीही नियुक्ती करण्यात आली.

आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश मिळाल्याने सद्यस्थितीचा अंदाज घेऊन रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचे विचाराधीन असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.आता कोणत्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे, कुठे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेशग्रामपंचायतींमधील निवडणूक प्रक्रिया अर्धवट स्थितीत थांबलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यभरातील १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा व गडचिरोली तसेच बाकी भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक