शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

अपंगांबाबत ग्रामपंचायत उदासीन

By admin | Updated: September 24, 2014 23:35 IST

शासनाकडून प्राप्त होणाऱ्या एकुण निधीच्या सुमारे तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणावर खर्च करावा, असे शासनाचे निर्देश असले तरी हा नियम राज्यातील एकही ग्रामपंचायत पाळत नसल्याचा

वैरागड : शासनाकडून प्राप्त होणाऱ्या एकुण निधीच्या सुमारे तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणावर खर्च करावा, असे शासनाचे निर्देश असले तरी हा नियम राज्यातील एकही ग्रामपंचायत पाळत नसल्याचा आरोप जनपरिसर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.वैरागड येथील शंकर मंदिर परिसरात अपंग जनकल्याण परिसर संघटनेची सभा सोमवारी पार पडली. याप्रसंगी अपंगांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान अपंग संघटनेचे पांडुरंग अल्बमकर, नानाजी लांजेवार, सारूबाई ढोक, महानंदा मेश्राम, सोमेश्वर मसुले, मीराबाई गेडाम यांच्यासह वैरागड परिसरातील १३ गावातील अपंग जनकल्याण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायत प्रशासनाला दरवर्षी लाखो रूपयांचा निधी प्राप्त होतो. या निधीतून विकासाची कामे करण्याबरोबरच जनतेच्या कल्याणकारक बाबीवरही खर्च करणे अपेक्षित आहे. त्यासाठीच ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या एकूण निधीपैकी तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणावर खर्च करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र कोणतीच ग्रामपंचायत एवढा खर्च करत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासाठी आपण लढा देऊ असे सभेमध्ये ठरविण्यात आले. त्याचबरोबर अपंगांना आॅनलाईनद्वारे अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अपंग व्यक्तीला स्वतंत्र रेशनकार्ड देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र धान्याचा पुरवठा शासनाने करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)