शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

मे मध्ये ग्रा.पं. रणसंग्राम

By admin | Updated: February 1, 2015 22:55 IST

मे महिन्यात जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

प्रशासनाची तयारी सुरू : २९९ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकागडचिरोली : मे महिन्यात जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. तर गावातील वातावरण आतापासूनच तापायला सुरूवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उतरंडीतील सर्वात शेवटचा घटक म्हणून ग्रामपंचायतीची ओळख असलेली तरी भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास करण्याची ताकद ग्रामपंचायतमध्ये आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जात आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाचा निधी सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे व या पैशाचा विनियोग करण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्व आणखी वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती आहेत. यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणूका २०१० साली पार पडल्या होत्या. यातील २९९ ग्रामपंचायतीची मुदत मे महिन्यात संपत आहे. मुदत संपताच नवीन सदस्यांची निवड होण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रशासन कामाला लागले आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका मे महिन्यातच घेण्यात याव्या, अशा स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या व्यतिरिक्त जुलै महिन्यात २८, आॅगस्ट महिन्यात दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एका मतालाही अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी १८ वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक युवक नोंदणी करणार आहे. त्यादृष्टीने नवीन मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती नक्षलग्रस्त भागात मोडतात. नक्षल्यांचा लोकशाहीस विरोध असल्याने नक्षली निवडणुकीच्या कालावधीत घातपात करण्याच्या उद्देशाने योजना आखतात. त्याचबरोबर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरणही निर्माण करतात. नक्षल्यांच्या या कारवायांना न जुमानता भयमुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्या उद्देशाने येथील निवडणूक व पोलीस प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे प्रशासनसुध्दा आताच कामाला लागले आहे. राजीनामा सत्रामुळेही ग्रा.पं.च्या जागा रिक्त राहतात. (नगर प्रतिनिधी)