शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

मे मध्ये ग्रा.पं. रणसंग्राम

By admin | Updated: February 1, 2015 22:55 IST

मे महिन्यात जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

प्रशासनाची तयारी सुरू : २९९ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकागडचिरोली : मे महिन्यात जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. तर गावातील वातावरण आतापासूनच तापायला सुरूवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उतरंडीतील सर्वात शेवटचा घटक म्हणून ग्रामपंचायतीची ओळख असलेली तरी भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास करण्याची ताकद ग्रामपंचायतमध्ये आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जात आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाचा निधी सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे व या पैशाचा विनियोग करण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्व आणखी वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती आहेत. यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणूका २०१० साली पार पडल्या होत्या. यातील २९९ ग्रामपंचायतीची मुदत मे महिन्यात संपत आहे. मुदत संपताच नवीन सदस्यांची निवड होण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रशासन कामाला लागले आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका मे महिन्यातच घेण्यात याव्या, अशा स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या व्यतिरिक्त जुलै महिन्यात २८, आॅगस्ट महिन्यात दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एका मतालाही अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी १८ वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक युवक नोंदणी करणार आहे. त्यादृष्टीने नवीन मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती नक्षलग्रस्त भागात मोडतात. नक्षल्यांचा लोकशाहीस विरोध असल्याने नक्षली निवडणुकीच्या कालावधीत घातपात करण्याच्या उद्देशाने योजना आखतात. त्याचबरोबर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरणही निर्माण करतात. नक्षल्यांच्या या कारवायांना न जुमानता भयमुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्या उद्देशाने येथील निवडणूक व पोलीस प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे प्रशासनसुध्दा आताच कामाला लागले आहे. राजीनामा सत्रामुळेही ग्रा.पं.च्या जागा रिक्त राहतात. (नगर प्रतिनिधी)