शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मे मध्ये ग्रा.पं. रणसंग्राम

By admin | Updated: February 1, 2015 22:55 IST

मे महिन्यात जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

प्रशासनाची तयारी सुरू : २९९ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकागडचिरोली : मे महिन्यात जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. तर गावातील वातावरण आतापासूनच तापायला सुरूवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उतरंडीतील सर्वात शेवटचा घटक म्हणून ग्रामपंचायतीची ओळख असलेली तरी भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास करण्याची ताकद ग्रामपंचायतमध्ये आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जात आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाचा निधी सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे व या पैशाचा विनियोग करण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्व आणखी वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती आहेत. यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणूका २०१० साली पार पडल्या होत्या. यातील २९९ ग्रामपंचायतीची मुदत मे महिन्यात संपत आहे. मुदत संपताच नवीन सदस्यांची निवड होण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रशासन कामाला लागले आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका मे महिन्यातच घेण्यात याव्या, अशा स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या व्यतिरिक्त जुलै महिन्यात २८, आॅगस्ट महिन्यात दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एका मतालाही अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी १८ वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक युवक नोंदणी करणार आहे. त्यादृष्टीने नवीन मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती नक्षलग्रस्त भागात मोडतात. नक्षल्यांचा लोकशाहीस विरोध असल्याने नक्षली निवडणुकीच्या कालावधीत घातपात करण्याच्या उद्देशाने योजना आखतात. त्याचबरोबर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरणही निर्माण करतात. नक्षल्यांच्या या कारवायांना न जुमानता भयमुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्या उद्देशाने येथील निवडणूक व पोलीस प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे प्रशासनसुध्दा आताच कामाला लागले आहे. राजीनामा सत्रामुळेही ग्रा.पं.च्या जागा रिक्त राहतात. (नगर प्रतिनिधी)