शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 23, 2016 01:17 IST

जिल्ह्यात मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

आनंदराव गेडाम यांची टीका : कुरखेडा येथे पत्रकार परिषदकुरखेडा : जिल्ह्यात मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र संवेदनाहीन विद्यमान राज्य सरकार कोणतीच भरीव मदत शेतकऱ्यांना करण्यासाठी तयार नाही. शेतकऱ्यांकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केला आहे. स्थानिक विश्रामगृहात २२ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. मागील वर्षी सरसरीच्या ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे धान पिकाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गावांसह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील गावांची आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. शासनाने या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांना तेथे सोयीसुविधा पुरविण्याचे आश्चासन दिले होते. मात्र आता दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शासन कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही. कर्जाच्या खाईमुळे शेतकरी हवालदिल व निराश झाला आहे. तीन वर्षांपूर्वी जून व जुलै २०१३ या कालावधीत विदर्भात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीबाबत २०१३ च्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राज्यव्यापी पॅकेज जाहीर केले होते. विद्यमान शासन मात्र उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असतांनाही कोणतीही उपाययोजना करण्याच्या मन:स्थितीत नाही. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देत भाजपाचे सरकार निवडून आले आहे. किमान निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन शासनाने पाळावे, असे आवाहन माजी आ. गेडाम यांनी केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेसचे प्रभारी जयंत हरडे, क्षेत्र प्रमुख अमोल पवार, धनराज लाकडे, रोहित ढवळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)केवळ आश्वासनावरच सरकारचा भरराज्य व केंद्रातील सरकार विविध प्रकारचे नवनवीन आश्वासन देत जनतेची दिशाभूल करण्याचे काम मागील एक वर्षापासून सुरू केले आहे. अत्यंत आकर्षक योजनांची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात येते. मात्र या योजनांची अंमलबजावणी शून्य असल्याने त्यांचे काहीच परिणाम दिसून येत नाही. राज्यभरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मात्र यावर शासन पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यास तयार नाही. केवळ काँग्रेसच्या जुन्या सरकारवर टीका करण्याचे काम विद्यमान भाजपा सरकार करीत आहे. सरकारने कृतीवर भर देण्याची मागणी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी केली.