शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 23, 2016 01:17 IST

जिल्ह्यात मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

आनंदराव गेडाम यांची टीका : कुरखेडा येथे पत्रकार परिषदकुरखेडा : जिल्ह्यात मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र संवेदनाहीन विद्यमान राज्य सरकार कोणतीच भरीव मदत शेतकऱ्यांना करण्यासाठी तयार नाही. शेतकऱ्यांकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केला आहे. स्थानिक विश्रामगृहात २२ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. मागील वर्षी सरसरीच्या ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे धान पिकाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गावांसह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील गावांची आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. शासनाने या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांना तेथे सोयीसुविधा पुरविण्याचे आश्चासन दिले होते. मात्र आता दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शासन कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही. कर्जाच्या खाईमुळे शेतकरी हवालदिल व निराश झाला आहे. तीन वर्षांपूर्वी जून व जुलै २०१३ या कालावधीत विदर्भात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीबाबत २०१३ च्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राज्यव्यापी पॅकेज जाहीर केले होते. विद्यमान शासन मात्र उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असतांनाही कोणतीही उपाययोजना करण्याच्या मन:स्थितीत नाही. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देत भाजपाचे सरकार निवडून आले आहे. किमान निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन शासनाने पाळावे, असे आवाहन माजी आ. गेडाम यांनी केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेसचे प्रभारी जयंत हरडे, क्षेत्र प्रमुख अमोल पवार, धनराज लाकडे, रोहित ढवळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)केवळ आश्वासनावरच सरकारचा भरराज्य व केंद्रातील सरकार विविध प्रकारचे नवनवीन आश्वासन देत जनतेची दिशाभूल करण्याचे काम मागील एक वर्षापासून सुरू केले आहे. अत्यंत आकर्षक योजनांची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात येते. मात्र या योजनांची अंमलबजावणी शून्य असल्याने त्यांचे काहीच परिणाम दिसून येत नाही. राज्यभरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मात्र यावर शासन पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यास तयार नाही. केवळ काँग्रेसच्या जुन्या सरकारवर टीका करण्याचे काम विद्यमान भाजपा सरकार करीत आहे. सरकारने कृतीवर भर देण्याची मागणी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी केली.