शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाबाबत सरकार सुस्त

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. ते पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. मात्र राज्य सरकार या प्रश्नावर उदासिन असल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांकडूनही अपेक्षाभंग : पूर्ववत करण्याची मागणीगडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. ते पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. मात्र राज्य सरकार या प्रश्नावर उदासिन असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरक्षण वाढवून देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र ते हवेतच विरले आहे. जिल्ह्यात ४६ टक्के ओबीसी समाज वास्तव्याला आहे. शेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी या समाजाला नोकऱ्या व पदोन्नतीमध्ये १९ टक्के आरक्षण होते. त्यानंतर ते ११ टक्के करण्यात आले. त्यातही कपात करून राज्य सरकारने ६ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या नोकर भरतीत ओबीसी हद्दपार झाले आहेत. गेल्या पाच वर्षात वन व पोलीस विभागाच्या भरतीत केवळ ७५ ओबीसींना नोकऱ्या मिळू शकल्या. आरक्षण वाढविण्याची मागणी ओबीसी समाज गेल्या १० वर्षांपासून करीत आहे. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झालीत. परंतु अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी या मुद्यावर गळचेपी भूमिका घेत आहेत. शहरात विविध ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन साखळी उपोषण व आमरण उपोषणही केले. त्यावेळी चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार व आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आंदोलनकर्त्यांना ही मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चामोर्शी येथे मुख्यमंत्री आले असताना त्यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निवडणुकीनंतर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मार्गी लावला जाईल, असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच मराठा व मुस्लीम समाजाला अनुक्रमे २१ व ५ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण वाढीचा प्रश्न १२ जून नंतर मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनाही दिले होते. मात्र या मुद्यावर कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे ओबीसी समाजात शासनाप्रती प्रचंड नाराजी पसरली आहे. जिल्ह्यात लोकसभा व विधानसभेचे तीनही क्षेत्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधी ओबीसींच्या प्रश्नाचा पाठपुरावाच करीत नाही, असा आरोप आता होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाज आक्रमक होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)