शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

ओबीसी आरक्षणाबाबत सरकार सुस्त

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. ते पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. मात्र राज्य सरकार या प्रश्नावर उदासिन असल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांकडूनही अपेक्षाभंग : पूर्ववत करण्याची मागणीगडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. ते पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. मात्र राज्य सरकार या प्रश्नावर उदासिन असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरक्षण वाढवून देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र ते हवेतच विरले आहे. जिल्ह्यात ४६ टक्के ओबीसी समाज वास्तव्याला आहे. शेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी या समाजाला नोकऱ्या व पदोन्नतीमध्ये १९ टक्के आरक्षण होते. त्यानंतर ते ११ टक्के करण्यात आले. त्यातही कपात करून राज्य सरकारने ६ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या नोकर भरतीत ओबीसी हद्दपार झाले आहेत. गेल्या पाच वर्षात वन व पोलीस विभागाच्या भरतीत केवळ ७५ ओबीसींना नोकऱ्या मिळू शकल्या. आरक्षण वाढविण्याची मागणी ओबीसी समाज गेल्या १० वर्षांपासून करीत आहे. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झालीत. परंतु अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी या मुद्यावर गळचेपी भूमिका घेत आहेत. शहरात विविध ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन साखळी उपोषण व आमरण उपोषणही केले. त्यावेळी चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार व आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आंदोलनकर्त्यांना ही मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चामोर्शी येथे मुख्यमंत्री आले असताना त्यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निवडणुकीनंतर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मार्गी लावला जाईल, असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच मराठा व मुस्लीम समाजाला अनुक्रमे २१ व ५ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण वाढीचा प्रश्न १२ जून नंतर मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनाही दिले होते. मात्र या मुद्यावर कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे ओबीसी समाजात शासनाप्रती प्रचंड नाराजी पसरली आहे. जिल्ह्यात लोकसभा व विधानसभेचे तीनही क्षेत्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधी ओबीसींच्या प्रश्नाचा पाठपुरावाच करीत नाही, असा आरोप आता होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाज आक्रमक होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)