शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

ओबीसींवरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:08 IST

जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्यात आल्याने ओबीसी प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांची रोजगाराची संधी हिरावली गेली. जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या अधिक ...

जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्यात आल्याने ओबीसी प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांची रोजगाराची संधी हिरावली गेली. जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या अधिक असतानाही आरक्षण कमी करून इतर प्रवर्गांना देण्यात आले. त्यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. अशातच पेसा कायदा लागू करण्यात आल्याने गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील आदिवासी भागातील वर्ग ३ व ४ च्या पदांची भरती अनुसूचित जमातीतून करण्याचा राज्यपालांचा आदेश असल्याने ही बाबही ओबीसीसाठी अन्यायकारक ठरली आहे. या प्रकरणात तत्कालीन सरकारने समिती गठित केली. मात्र, त्यावर निर्णय झालेला नाही.

सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश असलेली समिती गठित केली आहे. या समितीनेही सहा जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करण्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. मात्र, हे आरक्षण ५२ टक्क्यांच्यावर जात असल्याने व मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळाला आहे. मराठा समाज गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत नगण्य प्रमाणात असून, त्यांना जर आरक्षण मिळाले तर त्यातून किंवा अधिकचे आरक्षण ओबीसी समाजाला वाढवून देण्याचा विचार सरकारने केला असता; परंतु आता आरक्षणवाढीचा विचार थंडबस्त्यात असल्याने गेल्या १५ वर्षांत व आताही ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.

विद्यमान सरकारने यामध्ये तत्काळ हस्तक्षेप करून पूर्वीप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींचे आरक्षण पूर्ववत केल्यास येथील बेरोजगारांना न्याय मिळेल. यासाठी ओबीसी समाजबांधवांनी २२ फेब्रुवारीच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काॅंग्रेस डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी केले आहे.