शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अहवालात जिवंत वृक्षांची माहिती गुलदस्त्यातच

By admin | Updated: April 27, 2017 01:11 IST

विविध शासकीय, निमशासकीय व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या....

आॅक्टोबरनंतर अहवालच गेला नाही : मेमध्ये पुन्हा गणना करणार; नगर पालिका क्षेत्रातील रोपांची अवस्था वाईटच गडचिरोली : विविध शासकीय, निमशासकीय व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमानंतर शासनाकडे लावलेल्या व जिवंत असलेल्या झाडाच्या अहवालाची माहिती आॅक्टोबर २०१६ मध्ये देण्यात आली होती. मात्र त्यानंतर शासनाकडे याबाबतचा कोणताही अहवाल पाठविण्यात आला नाही. आगामी मे महिन्यामध्ये पुन्हा गेल्यावर्षीच्या वृक्षाची गणना करून अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे विविध यंत्रणांनी लावलेले किती रोपे सद्य:स्थितीत जिवंत आहेत, ही बाब गुलदस्त्यातच आहे. जुलै २०१६ मध्ये लावण्यात आलेल्या वृक्षाची आॅक्टोबर २०१६ मध्ये माहिती घेऊन अहवाल पाठविण्यात आला. या अहवालात बऱ्याच शासकीय यंत्रणांनी ९५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सरकारला कळविले. त्यामुळे आता मे महिन्याच्या अहवालावर पुढची भिस्त अवलंबून राहणार आहे. देसाईगंज तालुक्यात २०१६-१७ या वर्षात ९० हजार रोपांची लागवड करण्यात आली. आॅक्टोबर २०१६ पर्यंत ८८ हजार रोेपे जिवंत असल्याची माहिती देण्यात आली होती. आता किती रोपे जिवंत आहेत, याची माहिती वन विभागाकडे नाही. मे महिन्यात गणना होणार आहे. तेव्हा माहिती कळेल, असे वन विभागाच्या सूत्रांनी लोकमतला सांगितले. देसाईगंज नगर पालिकेला २ हजार रोपांच्या लागवडीचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यांनी १ हजार रोपांची लागवड केली. एक हजार शहरातील शाळा व महाविद्यालयांना देण्यात आली. त्यापैकी १ हजार ५४४ रोपे जिवंत असल्याचे आॅक्टोबर २०१६ च्या अहवालात नमूद करण्यात आले होते. सद्य:स्थितीत नगर पालिकेकडे गतवर्षीच्या वृक्षारोपणातील रोपांच्या स्थितीची माहिती उपलब्ध नाही. पंचायत समितीनेही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंकरपूर व शिवराजपूर ग्राम पंचायतींना २ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दिला. त्यापैकी १ हजार ९६८ वृक्ष जिवंत असल्याचे सांगण्यात आले. ही सर्व माहिती कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात वृक्षारोपण करण्यात आलेल्या जागेवर वृक्षच राहिलेले नाही. पाण्याचा अभाव, वृक्ष जगविण्यासाठी करावयाचे नियोजन यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे सध्या बारा वाजले आहे. देसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीत बोटावर मोजण्याइतकेच रोपटे जिवंत राहिलेले आहे. दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने जुलै महिन्यात एकूण १ हजार ६५० रोपे आयटीआय बायपास रोड, गोकुलनगर, खरपुंडी मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन परिसर, शहराच्या अनेक वॉर्डातील ओपन स्पेस व रस्त्याच्या कडेला लावण्यात आले. यापैकी ९५० म्हणजे ५७ टक्के वृक्ष जिवंत आहेत, असे दोन महिन्यापूर्वी पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले, अशी माहिती न. प. प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र गडचिरोली शहरात पाहणी केली असता, संरक्षण कठड्याअभावी निम्मे वृक्ष नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून रोपवाटिकेतून १ लाख १० हजार रूपये किंमतीच्या रोपांची खरेदी केली होती. तर काही रोपे सामाजिक वनीकरण विभागाकडून मिळविली होती. सर्वेक्षणानंतर दोन ते अडीच महिन्यात उष्णतामानाने पुन्हा बरीचशी रोपे करपली असल्याचे दिसून येत आहे. एकूणच वृक्ष लागवडीची शहरी भागात बोजवारा उडाला आहे.