शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी सरकारी धोरणच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:18 IST

विद्यमान सरकारसह यापूर्वीच्याही सरकारांनी शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने शहीद अभिवादन,....

ठळक मुद्दे रघुनाथदादा पाटील यांची टीका : शेतकरी जागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान सरकारसह यापूर्वीच्याही सरकारांनी शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने शहीद अभिवादन, शेतकरी जागृती यात्रा काढली जात आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.सुकाणू समितीच्या वतीने राज्यातील ३६ जिल्हे व कर्नाटक राज्यातील बेडगाव जिल्ह्यात शहीद अभिवादन शेतकरी जागृत यात्रा राबविली जात आहे. सदर यात्रा गडचिरोली येथे गुरूवारी दाखल झाली. यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.पुढे माहिती देताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, सातत्याने होणाºया शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास केला असता, उत्पादन खर्चाएवढाही भाव शेतमालाला मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही शेतकºयांनी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर काँग्रेस सरकारने स्वामीनाथन आयोगाची नेमणूक केली. या आयोगाने उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची शिफारस केली. मात्र याकडे काँग्रेस सरकारने व विद्यमान भाजपा सरकारनेही दुर्लक्ष केले आहे. सध्याचे सरकार केवळ जुनेच धोरण अमलात आणत आहे. त्यामुळे याही सरकारच्या काळात शेतकºयांवर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. विरोधी पक्ष सुध्दा सरकारच्या विरोधात ठोस भूमिका घेत नाही. लोकप्रतिनिधी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याऐवजी रस्त्यावर येऊन आंदोलनाच्या माध्यमातून गोंधळ घालत आहेत. यावरून सरकार व विरोधी पक्ष सुध्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. केवळ राजकारणासाठी शेतकºयांच्या मुद्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची गरज आहे, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, गणेश जगताप, संजय जगताप, आनंद भालेकर, आनंद शिंदे, रामेश्वर गाढे, चंद्रशेखर भडांगे, अरूण मुनघाटे, डॉ. महेश कोपुलवार, दत्तात्रय बर्लावार, भरत येरमे, पांडुरंग घोटेकर, देवराव चवळे आदी उपस्थित होते.१४ मे रोजी जेलभरो आंदोलनसर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, शेतकरी पुन्हा कर्जाच्या खायीत सापडू नये, यासाठी उत्पादन खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा असा भाव द्यावा, सरसकट शेतकरी कर्ज व वीज बिल माफ करावे, आदी मागण्यांसाठी २३ मार्चपासून शहीद अभिवादन, शेतकरी जागृत यात्रा काढली जात आहे. या यात्रेचा पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर २७ एप्रिल रोजी समारोप होईल. १४ मे रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. शेतकºयांनी स्वत:ची ताकद सरकारला दाखविण्यासाठी या आंदोलनात कुटुंबासह सहभाग नोंदवावा, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले.