शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी सरकारी धोरणच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:18 IST

विद्यमान सरकारसह यापूर्वीच्याही सरकारांनी शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने शहीद अभिवादन,....

ठळक मुद्दे रघुनाथदादा पाटील यांची टीका : शेतकरी जागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान सरकारसह यापूर्वीच्याही सरकारांनी शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने शहीद अभिवादन, शेतकरी जागृती यात्रा काढली जात आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.सुकाणू समितीच्या वतीने राज्यातील ३६ जिल्हे व कर्नाटक राज्यातील बेडगाव जिल्ह्यात शहीद अभिवादन शेतकरी जागृत यात्रा राबविली जात आहे. सदर यात्रा गडचिरोली येथे गुरूवारी दाखल झाली. यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.पुढे माहिती देताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, सातत्याने होणाºया शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास केला असता, उत्पादन खर्चाएवढाही भाव शेतमालाला मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही शेतकºयांनी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर काँग्रेस सरकारने स्वामीनाथन आयोगाची नेमणूक केली. या आयोगाने उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची शिफारस केली. मात्र याकडे काँग्रेस सरकारने व विद्यमान भाजपा सरकारनेही दुर्लक्ष केले आहे. सध्याचे सरकार केवळ जुनेच धोरण अमलात आणत आहे. त्यामुळे याही सरकारच्या काळात शेतकºयांवर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. विरोधी पक्ष सुध्दा सरकारच्या विरोधात ठोस भूमिका घेत नाही. लोकप्रतिनिधी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याऐवजी रस्त्यावर येऊन आंदोलनाच्या माध्यमातून गोंधळ घालत आहेत. यावरून सरकार व विरोधी पक्ष सुध्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. केवळ राजकारणासाठी शेतकºयांच्या मुद्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची गरज आहे, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, गणेश जगताप, संजय जगताप, आनंद भालेकर, आनंद शिंदे, रामेश्वर गाढे, चंद्रशेखर भडांगे, अरूण मुनघाटे, डॉ. महेश कोपुलवार, दत्तात्रय बर्लावार, भरत येरमे, पांडुरंग घोटेकर, देवराव चवळे आदी उपस्थित होते.१४ मे रोजी जेलभरो आंदोलनसर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, शेतकरी पुन्हा कर्जाच्या खायीत सापडू नये, यासाठी उत्पादन खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा असा भाव द्यावा, सरसकट शेतकरी कर्ज व वीज बिल माफ करावे, आदी मागण्यांसाठी २३ मार्चपासून शहीद अभिवादन, शेतकरी जागृत यात्रा काढली जात आहे. या यात्रेचा पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर २७ एप्रिल रोजी समारोप होईल. १४ मे रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. शेतकºयांनी स्वत:ची ताकद सरकारला दाखविण्यासाठी या आंदोलनात कुटुंबासह सहभाग नोंदवावा, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले.