शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

शासनाने जनतेचा केला विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:11 IST

भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन चार वर्षांच्या कालावधीत अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. आज २६ मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस जिल्हाध्यक्षांची टीका : आज काँग्रेस व मित्रपक्ष ‘विश्वासघात दिन’ पाळणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन चार वर्षांच्या कालावधीत अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. आज २६ मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस आणि मित्रपक्ष विश्वासघात दिन पाळणार आहेत, माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी शुक्रवारी २५ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, महासचिव एजाज शेख, सोनटक्के, जितू मुनघाटे, रजनीकांत मोटघरे, सेवानिवृत्त उपमुख्याधिकारी पी.टी. मसराम, गावतुरे, तुळशीदास भोयर, दिवाकर निसार, मिलिंद बांगरे उपस्थित होते .पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आ. डॉ. उसेंडी म्हणाले, २६ मे रोजी भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी व फडणवीस सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी, सर्वसामान्यांना मोठे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर ही आश्वासने पूर्ण न करून जनतेची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला मागील चार वर्षांत न परवडणारा भाव दिला. त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात विविध मोठमोठे घोटाळे झाले आहेत. ते घोटाळे करणारे सरकारचेच लागेबांधे असल्याने ते पळून जाण्यास यशस्वी झाले, अशी टीका सुद्धा डॉ. उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत केली.काँगेसच्या काळात १४८ डॉलर हा एक बॅरल कच्च्या तेलाचा भाव होता. त्यावेळी ६५ ते ७० रुपये दराने पेट्रोल मिळत होते. परंतु आज ९० डॉलर एक बॅरल असूनसुद्धा पेट्रोलच्या किमती वाढून ८४ रुपये लिटर दर झाला आहे. या किमती वाढवून सरकारने जनतेची मोठी लूट केली आहे. हे सरकार लुटारू असल्याचे उसेंडी म्हणाले. जीएसटीमुळे जिल्ह्यातील तेंदूपत्त्याचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकºयांपेक्षा विमा कंपन्यांनाच अधिक होत आहे. चार वर्षांपासून आदिवासी, ओबीसी व इतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेऊन अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. सरकारच्या निषेधार्थ उद्या २६ मे रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने ‘विश्वासघात दिन’ साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्ते व मित्र पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उसेंडी यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेस