शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

शासनाने जनतेचा केला विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:11 IST

भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन चार वर्षांच्या कालावधीत अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. आज २६ मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस जिल्हाध्यक्षांची टीका : आज काँग्रेस व मित्रपक्ष ‘विश्वासघात दिन’ पाळणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन चार वर्षांच्या कालावधीत अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. आज २६ मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस आणि मित्रपक्ष विश्वासघात दिन पाळणार आहेत, माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी शुक्रवारी २५ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, महासचिव एजाज शेख, सोनटक्के, जितू मुनघाटे, रजनीकांत मोटघरे, सेवानिवृत्त उपमुख्याधिकारी पी.टी. मसराम, गावतुरे, तुळशीदास भोयर, दिवाकर निसार, मिलिंद बांगरे उपस्थित होते .पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आ. डॉ. उसेंडी म्हणाले, २६ मे रोजी भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी व फडणवीस सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी, सर्वसामान्यांना मोठे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर ही आश्वासने पूर्ण न करून जनतेची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला मागील चार वर्षांत न परवडणारा भाव दिला. त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात विविध मोठमोठे घोटाळे झाले आहेत. ते घोटाळे करणारे सरकारचेच लागेबांधे असल्याने ते पळून जाण्यास यशस्वी झाले, अशी टीका सुद्धा डॉ. उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत केली.काँगेसच्या काळात १४८ डॉलर हा एक बॅरल कच्च्या तेलाचा भाव होता. त्यावेळी ६५ ते ७० रुपये दराने पेट्रोल मिळत होते. परंतु आज ९० डॉलर एक बॅरल असूनसुद्धा पेट्रोलच्या किमती वाढून ८४ रुपये लिटर दर झाला आहे. या किमती वाढवून सरकारने जनतेची मोठी लूट केली आहे. हे सरकार लुटारू असल्याचे उसेंडी म्हणाले. जीएसटीमुळे जिल्ह्यातील तेंदूपत्त्याचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकºयांपेक्षा विमा कंपन्यांनाच अधिक होत आहे. चार वर्षांपासून आदिवासी, ओबीसी व इतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेऊन अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. सरकारच्या निषेधार्थ उद्या २६ मे रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने ‘विश्वासघात दिन’ साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्ते व मित्र पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उसेंडी यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेस