शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

‘गोंडवाना’ला नवीन कुलगुरूचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

गोंडवाना विद्यापीठाच्या कायद्यानुसार नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी करावी लागते. त्याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या ४ एप्रिलच्या सभेत यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या २८ एप्रिल रोजी व्यवस्थापन व विद्या परिषदेची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहालचाली वाढल्या : सप्टेंबरमध्ये संपणार कल्याणकर यांचा कार्यकाळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांसाठी असलेल्या गोंडवाना विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या ७ सप्टेंबर २०२० रोजी संपणार आहे. त्यामुळे विद्यापीठ कायद्यानुसार गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदावर पोहोचण्यासाठी काही शिक्षणतज्ज्ञांनी हालचाली सुरू केल्या आहेत.गोंडवाना विद्यापीठाच्या कायद्यानुसार नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी करावी लागते. त्याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या ४ एप्रिलच्या सभेत यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या २८ एप्रिल रोजी व्यवस्थापन व विद्या परिषदेची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कुलगुरू निवड प्रक्रियेतील तीन तज्ज्ञ सदस्यांपैकी एका तज्ज्ञाची निवड केली जाणार, अशी माहिती कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी लोकमतशी बोलताना दिली. निवड समितीमधील उर्वरित दोन सदस्य राज्यपाल ठरवित असतात. विद्यापीठ कायद्यानुसार हे तीन सदस्य भारतातील अनेक नामांकित संस्थांमध्ये कार्यरत असावे किंवा निवृत्त न्यायाधीश तसेच सरकारच्या उपक्रमात प्रमुख म्हणून राहिलेले तज्ज्ञ व्यक्ती असतात. सदर तीन सदस्य कुलगुरूपदासाठी आलेल्या अर्जांची छाननी करून आणखी पाच नावे राज्यपालांना देतात. या पाच उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेऊन अखेर कुलगुरू निश्चित केला जातो. डॉ.कल्याणकर हे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ठरणार आहेत.कोरोनाचे संकट टळल्यावरच उन्हाळी परीक्षागोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची सभा ४ एप्रिल रोजी आॅनलाईन स्वरूपात पार पडली. या सभेत उन्हाळी परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कोरोनाच्या संचारबंदीमुळे १ ते १४ एप्रिल हा १४ दिवसांचा कालावधी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या म्हणून जाहीर करण्यात आल्या. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा घेण्यात येतील, असे या सभेत ठरविण्यात आले.