शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 19:22 IST

चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या वनसंपदेतून लोकांचा विकास करण्यासाठी विद्यापीठातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी दिली.

ठळक मुद्दे कुलगुरूंची पत्रपरिषदेत माहितीगोडवाना विद्यापीठाला ‘१२-बी’ चा दर्जा मिळाल्याने विकासाचा मार्ग झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) ‘१२-बी’ चा दर्जा मिळाल्याने विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हे विद्यापीठ आदिवासीबहुल व वनव्याप्त क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या वनसंपदेतून लोकांचा विकास करण्यासाठी विद्यापीठातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी दिली.१२-बी चा दर्जा मिळाल्यानंतर डॉ.वरखेडी यांनी गुरूवारी पत्र परिषद घेतली. यावेळी कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, अधिष्ठाता डॉ.सुरेश रैवतकर, डॉ.श्रीराम कावळे आदी उपस्थित होते.

गोंडवाना विद्यापीठाला यूजीसीकडून १२-बी चा दर्जा मिळाल्यामुळे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना अनुदान प्राप्त होणार आहे. विविध भौतिक सुविधा व इतर नवीन विकास कामे करण्यासाठी यूजीसीकडून निधी उपलब्ध होणार आहे, असे डॉ.वरखेडी यांनी सांगितले. सकारात्मक दृष्टिकोनातून सामूहिक प्रयत्नाने या विद्यापीठाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आदिवासीबहुल भागात हे विद्यापीठ असल्याने आदिवासींची भाषा, परंपरा, संस्कृती व येथील वनातून रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठाच्या वतीने उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल. त्याअनुषंगाने या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा मिळणे गरजेचे आहे.एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबईला महिला विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा देण्यात आला. याच धर्तीवर गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाला आदिवासीबहुल व वनव्याप्त क्षेत्र या मुद्यावर विशेष दर्जा शासनाकडून मिळावा, यासाठी आपला प्रयत्न राहणार असून लवकरच यासंदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव विद्यापीठाच्या वतीने शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी सांगितले.

३० महाविद्यालये अनुदानासाठी पात्रगोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील एकूण ३० महाविद्यालयाचे अकॅडमीक ऑडीट झाले असून यातील सात कॉलेज १२-बी च्या अनुदानासाठी पात्र झाले आहे. सर्वच ३० ही कॉलेज ‘अ’ श्रेणीमध्ये आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांना १२-बी अंतर्गत शासनाचे अनुदान मिळणार आहे, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ.वरखेडी यांनी दिली. विद्यापीठ कॅम्पसमध्ये विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबतच विकास कामाला गती देऊन या विद्यापीठाचा नावलौकीक करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र