शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

सोनेरांगीत नियमबाह्यवृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:30 IST

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका कंत्राटदाराने शेतकऱ्याच्या शेतातील वृक्षांची अवैध तोड केली आहे. तसेच या वृक्षांची नियमबाह्यपणे विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची परवानगी आवश्यक : आदिवासींची झाडे असतानाही लाकडांचा लिलाव केला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका कंत्राटदाराने शेतकऱ्याच्या शेतातील वृक्षांची अवैध तोड केली आहे. तसेच या वृक्षांची नियमबाह्यपणे विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथील खिरसागर रंधये व इतर शेतकरी यांच्या वर्ग १ जमिनीवर ३५० झाडे होती. एका कंत्राटदाराने ही संपूर्ण झाडे केवळ १८ हजार रुपयांत खरेदी केली. सहायक वनरक्षक देसाईगंज आणि देलनवाडीचे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या संगणमताने येन, बिजा व मोहफुलाच्या झाडाची अवैध वृक्षतोड केली. वर्ग १ मधील झाडे तोडायची असल्यास नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते.फळ, फुलाचे झाड तोडायचे असल्यास त्या झाडांना मागील चार वर्षांपासून फूल येत नाही व ते झाड वयस्कर झाले असेल तर त्या स्वरूपाचे नाहरकत प्रमाणपत्र कृषी अधिकाऱ्याकडून प्राप्त झाल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी फळझाडे तोडण्याची परवानगी द्यायची असते. मात्र या सर्व नियमांची पायमल्ली करून वृक्षतोड करण्यात आली आहे. सदर झाडे आदिवासींच्या खसऱ्यामधील असल्याने या झाडांची तोड वनविभागामार्फत करण्यात येऊन सदर झाडे लाकडे सरकारी डेपोत जमा करून त्याचा लिलाव करावा लागतो. लिलावानंतर मिळालेली रक्कम जमीन मालकाला द्यायची राहते. मात्र हे सर्व नियम डावलून वृक्षतोड झाली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.३५० झाडांची केवळ १८ हजार रुपयांत विक्रीशेतकºयांच्या शेतात सुमारे ३५० झाडे होती. आजच्या बाजार किमतीनुसार या झाडांच्या लाकडांची किंमत लाखोंच्या घरात आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कंत्राटदाराने सदर लाकडे केवळ १८ हजार रुपयांत खरेदी केली. सोनेरांगी टोला येथील समाज मंदिराच्या बाजूला बिजा व येन लाकडाने दोन ट्रक भरले जात आहेत, अशी माहिती गावकºयांनी वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने २३ जून रोजी शनिवारी सकाळी ७ वाजता भेट दिली असता, दोन्ही ट्रक लाकडाने भरले होते. त्यांना वाहतूक परवानाही देण्यात आला होता. उर्वरित लाकडे त्याच ठिकाणी पडून आहेत. वनविभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग