शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी सिरोंचासाठी ठरली नुकसानीचीच

By admin | Updated: May 12, 2016 01:34 IST

सिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असून या नद्यांचा सिंचनासाठी काहीही उपयोग झाला नाही.

गोदावरीने गडपली जमीनही : मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पालगतचाच भाग बाधितआनंद मांडवे सिरोंचासिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असून या नद्यांचा सिंचनासाठी काहीही उपयोग झाला नाही. उलट प्रत्येक पावसाळ्यात पुरामुळे कोट्यवधींच्या खरीप व रबी पिकांचे नुकसान झाले. शिवाय महापुराच्या तडाख्याने शेकडो हेक्टर सुपीक जमीन गोदावरीत गडप झाली. शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद असलेली जमीन प्रत्यक्षात मोक्यावर नाही. १९५८ मध्ये गोदावरी, प्राणहिताला प्रचंड पूर येऊन हजारो नागरिक विस्थापित झाले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८४६ मध्ये वसविलेल्या सिरोंचा, रयतवारी क्षेत्राचे नजीकच्या क्षेत्रात पुनर्वसन करण्यात आले. त्यासाठी झुडुपी जंगल कटाई करून आपदग्रस्तांना निवासी प्रयोजनार्थ भूखंडाचे वाटप करण्यात आले. सिरोंचा नगराचा भाग असलेले हे गाव सिरोंचा मालगुजारी (कोत्तागुडम) म्हणून सध्या अस्तित्वात आहे. १९८६ व १९८९ च्या महापुरानेही फार नुकसान झाले. यावेळी मद्दिकुंटा, आरडा, लंबडपल्ली, पेंटिपाका, तुमनुरसह अंकिसा-आसरअल्ली गावातील अनेकांचे पुनर्वसन झाले. १९९५ च्या महापुराने तालुक्यातील १४८ गावांपैकी १०३ गावे प्रभावित होऊन शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. आॅक्टोबर २००८ मध्ये विद्युत पुरवठा व सिंचनाअभावी कापूस पीक धोक्यात आले. कधी अवर्षणाने तर कधी अनियमित विद्युत पुरवठ्याने पीक धोक्यात आले असतांना तालुक्यातील बंधाऱ्यांनीही साथ दिली नाही. १९९५ मध्ये राजस्व निरीक्षण मंडळ सिरोंचा अंतर्गत १८९४ शेतकऱ्यांच्या १६७.७६ हेक्टर खरीप तर १६८६ हेक्टर रबी पिकांचे नुकसान झाले. आसरअल्ली सर्कलमधील ५३ गावातील २६८.०२ हेक्टर खरीप व २८७६ हेक्टर रबी पीक वाया गेले. २००८ व २००९ मध्येही पुराने शेतीचे नुकसान झाले. २०१० मध्ये संततधार पाऊस होऊन पुराने १४८ गावांपैकी ६८ गावांतील २ हजार ५६ हेक्टरमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. यात २२४० शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख ९४ हजार ८०० रूपयांचे नुकसान झाले. यातील सर्वाधिक बाधित क्षेत्र कापसाचे व आराजी १२१४ हेक्टर होती. त्या खालोखाल ७८७ हेक्टर धान पीक तर ५५ हेक्टर सोयाबिन पिकाला फटका बसला. यासह बामणी, टेकडाताला, पेंटीपाका येथीलही पिकांचे नुकसान झाले. पेंटीपाका मंडळातील १५१ शेतकऱ्यांचे नुकसान १४ लक्ष २१ हजारांचे झाले. आजतागायत आसरअल्ली सर्कलमधील ५८० हेक्टर ७५ आर शेतजमीन गोदावरीच्या पुराने खरडून गेली. यात आसरअल्लीची १८३.५० हेक्टर, अंकिसा माल १०५.८७ हेक्टर, अंकिसा चक येथील ६२.५०, सुंकरअल्लीची ९०, टेकडामोटला येथील ६६.७८ व मुत्तापूर माल येथील ७१ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. तत्कालीन जमिनदार व्यंकट मुरली मनोहर राव यांची आजतागायत तीन हजार एकर जमीन गोदावरीत गडप झाली, असे जाणकार सांगतात.या पार्श्वभूमीवर तालुका मुख्यालयालगतची धर्मपुरी उपसा सिंचन योजना ३० वर्षांपासून प्रलंबित असून रेगुंठा उपसा सिंचनही पूर्णत्वास आले नाही. ग्रामीण भागातील छोटे कास्तकार कर्जबाजारी झाले. बहुसंख्य ग्रामीण आदिवासींना उदरनिर्वाहासाठी स्थानांतरण करावे लागले. अशा विपरीत परिस्थितीत १९९१ मध्ये पेद्दी शंकरन्नाच्या रूपात येथे तत्कालीन पीपल्स वॉर ग्रुप या नक्षल संघटनेला आयते मैदान मिळाले. कालांतराने येथे नक्षलवाद वाढीस लागला. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता ठेकेदारांकडून लूट होऊ लागली. सिंचनाअभावी शेतजमीन पडीत ठेवणारा मोठा शेतकरीवर्ग येथे तयार झाला. कोर्ला, रमेशगुडम भागातील शेतकऱ्यांची जमीन इंद्रावतीच्या काठावर आहे. परंतु सिंचनाची सोय नाही. शेतकऱ्यांनी तेलंगणाच्या करिमनगर, वरंगल येथून बियाणे आणून भुईमूग व कापसाची शेती निसर्गाच्या भरवशावर सुरू केली आहे.