शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

गोदावरी सिरोंचासाठी ठरली नुकसानीचीच

By admin | Updated: May 12, 2016 01:34 IST

सिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असून या नद्यांचा सिंचनासाठी काहीही उपयोग झाला नाही.

गोदावरीने गडपली जमीनही : मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पालगतचाच भाग बाधितआनंद मांडवे सिरोंचासिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असून या नद्यांचा सिंचनासाठी काहीही उपयोग झाला नाही. उलट प्रत्येक पावसाळ्यात पुरामुळे कोट्यवधींच्या खरीप व रबी पिकांचे नुकसान झाले. शिवाय महापुराच्या तडाख्याने शेकडो हेक्टर सुपीक जमीन गोदावरीत गडप झाली. शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद असलेली जमीन प्रत्यक्षात मोक्यावर नाही. १९५८ मध्ये गोदावरी, प्राणहिताला प्रचंड पूर येऊन हजारो नागरिक विस्थापित झाले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८४६ मध्ये वसविलेल्या सिरोंचा, रयतवारी क्षेत्राचे नजीकच्या क्षेत्रात पुनर्वसन करण्यात आले. त्यासाठी झुडुपी जंगल कटाई करून आपदग्रस्तांना निवासी प्रयोजनार्थ भूखंडाचे वाटप करण्यात आले. सिरोंचा नगराचा भाग असलेले हे गाव सिरोंचा मालगुजारी (कोत्तागुडम) म्हणून सध्या अस्तित्वात आहे. १९८६ व १९८९ च्या महापुरानेही फार नुकसान झाले. यावेळी मद्दिकुंटा, आरडा, लंबडपल्ली, पेंटिपाका, तुमनुरसह अंकिसा-आसरअल्ली गावातील अनेकांचे पुनर्वसन झाले. १९९५ च्या महापुराने तालुक्यातील १४८ गावांपैकी १०३ गावे प्रभावित होऊन शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. आॅक्टोबर २००८ मध्ये विद्युत पुरवठा व सिंचनाअभावी कापूस पीक धोक्यात आले. कधी अवर्षणाने तर कधी अनियमित विद्युत पुरवठ्याने पीक धोक्यात आले असतांना तालुक्यातील बंधाऱ्यांनीही साथ दिली नाही. १९९५ मध्ये राजस्व निरीक्षण मंडळ सिरोंचा अंतर्गत १८९४ शेतकऱ्यांच्या १६७.७६ हेक्टर खरीप तर १६८६ हेक्टर रबी पिकांचे नुकसान झाले. आसरअल्ली सर्कलमधील ५३ गावातील २६८.०२ हेक्टर खरीप व २८७६ हेक्टर रबी पीक वाया गेले. २००८ व २००९ मध्येही पुराने शेतीचे नुकसान झाले. २०१० मध्ये संततधार पाऊस होऊन पुराने १४८ गावांपैकी ६८ गावांतील २ हजार ५६ हेक्टरमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. यात २२४० शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख ९४ हजार ८०० रूपयांचे नुकसान झाले. यातील सर्वाधिक बाधित क्षेत्र कापसाचे व आराजी १२१४ हेक्टर होती. त्या खालोखाल ७८७ हेक्टर धान पीक तर ५५ हेक्टर सोयाबिन पिकाला फटका बसला. यासह बामणी, टेकडाताला, पेंटीपाका येथीलही पिकांचे नुकसान झाले. पेंटीपाका मंडळातील १५१ शेतकऱ्यांचे नुकसान १४ लक्ष २१ हजारांचे झाले. आजतागायत आसरअल्ली सर्कलमधील ५८० हेक्टर ७५ आर शेतजमीन गोदावरीच्या पुराने खरडून गेली. यात आसरअल्लीची १८३.५० हेक्टर, अंकिसा माल १०५.८७ हेक्टर, अंकिसा चक येथील ६२.५०, सुंकरअल्लीची ९०, टेकडामोटला येथील ६६.७८ व मुत्तापूर माल येथील ७१ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. तत्कालीन जमिनदार व्यंकट मुरली मनोहर राव यांची आजतागायत तीन हजार एकर जमीन गोदावरीत गडप झाली, असे जाणकार सांगतात.या पार्श्वभूमीवर तालुका मुख्यालयालगतची धर्मपुरी उपसा सिंचन योजना ३० वर्षांपासून प्रलंबित असून रेगुंठा उपसा सिंचनही पूर्णत्वास आले नाही. ग्रामीण भागातील छोटे कास्तकार कर्जबाजारी झाले. बहुसंख्य ग्रामीण आदिवासींना उदरनिर्वाहासाठी स्थानांतरण करावे लागले. अशा विपरीत परिस्थितीत १९९१ मध्ये पेद्दी शंकरन्नाच्या रूपात येथे तत्कालीन पीपल्स वॉर ग्रुप या नक्षल संघटनेला आयते मैदान मिळाले. कालांतराने येथे नक्षलवाद वाढीस लागला. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता ठेकेदारांकडून लूट होऊ लागली. सिंचनाअभावी शेतजमीन पडीत ठेवणारा मोठा शेतकरीवर्ग येथे तयार झाला. कोर्ला, रमेशगुडम भागातील शेतकऱ्यांची जमीन इंद्रावतीच्या काठावर आहे. परंतु सिंचनाची सोय नाही. शेतकऱ्यांनी तेलंगणाच्या करिमनगर, वरंगल येथून बियाणे आणून भुईमूग व कापसाची शेती निसर्गाच्या भरवशावर सुरू केली आहे.