शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीरमाता व वीरपत्नींचा भावपूर्ण गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

लोकमत समुहामार्फत महिला व शहीद कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातून कुटुंबियांना धीर मिळत आहे. वीर माता व भगिनींच्या अंगी विविध गुण आहेत. त्यांचा व्यक्तीमत्व विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यासाठी लोकमतचा हा सखी महोत्सव उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार डॉ. सचिन खोब्रागडे यांनी यावेळी काढले.

ठळक मुद्देसखींचा महोत्सव रंगला : शहिदांचे बलिदान महान असल्याचा मान्यवरांचा सूर, शहीद जवानांच्या शौर्याला उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकमत सखी मंच गडचिरोलीतर्फे स्थानिक आरमोरी मार्गावरील सुप्रभात मंगल कार्यालयात रविवारी सखी महोत्सव घेण्यात आला. तसेच यावेळी जिल्ह्यातील वीर माता व वीर पत्नींचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, साडी व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सचिन खोब्रागडे, गडचिरोली ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर उद्दार, पुनम गोरे, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे सैनिकी निदेशक सुभेदार नामदेव प्रधान, वीर माता कल्पना अमृतकर, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, डॉ. सुषमा जैन, सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते सखी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, समाजामध्ये आनंद वाटप केला की, ते वाढत असते. दु:ख वाटले की ते कमी होत असते. शहीद कुटुंबियांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न लोकमत समुहाकडून सुरू आहे. शहीद कुटुंबीय तसेच महिलांसाठी लोकमतने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. वीर माता व भगिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शहीद पोलीस जवानांच्या पाल्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे, असे डॉ. उसेंडी यांनी यावेळी सांगितले.लोकमत समुहामार्फत महिला व शहीद कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातून कुटुंबियांना धीर मिळत आहे. वीर माता व भगिनींच्या अंगी विविध गुण आहेत. त्यांचा व्यक्तीमत्व विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यासाठी लोकमतचा हा सखी महोत्सव उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार डॉ. सचिन खोब्रागडे यांनी यावेळी काढले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, संचालन प्रिया आखाडे, शिल्पा गुंडावार यांनी केले. तर आभार वडसाच्या संयोजिका कल्पना कापसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहसंयोजिका सोनिया बैस, रोहिणी मेश्राम, तृप्ती अलोणे, उज्वला साखरे, स्मिता खोब्रागडे, नैना मेश्राम आदींनी सहकार्य केले.या वीर माता व पत्नींचा झाला सत्कारयाप्रसंगी सखी मंचतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वच्छला रामभाऊ नैताम, कमला हलामी व अनिता महादेव भोयर या तीन वीर मातांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, साडी व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच मोहिनी प्रमोद भोयर, कल्पना पुरणशहा दुग्गा, नलिनी लक्ष्मण कोडाप, सविता शाहूदास मडावी, लिना किशोर बोबाटे, विनाताई कालिदास हलामी, आशाताई प्रकाश पाटील, छबीना हेमराज टेंभुर्णे, हर्षा संतोष दुर्गे, स्मिता दामोधर नैताम, संगीता विलास मांदाळे या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सखींचा सन्मानसखी मंचच्या चळवळीत उल्लेखनिय काम करणाऱ्या संयोजिका तसेच सखी सदस्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये वडसाच्या तालुका संयोजिका कल्पना कापसे, आरमोरीच्या तालुका संयोजिका सुनिता तागवान, जिल्हा सहसंयोजिका सोनिया बैस, तृप्ती अलोणे, धानोराच्या संयाजिका ज्योती उंदिरवाडे, लगामच्या संयोजिका योगीता गेडाम, सोनाली पालारपवार, प्रेमा आर्इंचवार, नवेगावच्या संयोजिका नलिनी बोरकर, अंजली वैरागडवार, नैना मेश्राम, प्रिती मेश्राम, उज्वला साखरे, मंगला बारापात्रे, अर्चना भांडारकर, पूजा भारद्वाज, रोहिनी मेश्राम आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत