शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

उन्हाळी पिकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

चामाेर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ हजार हेक्टरवर धान लागवडीसाठी पाण्याची मागणी केली हाेती; परंतु दिना प्रकल्प प्रशासनाने धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन केवळ ३५० हेक्टरवरील पिकांना पाणीपुरवठा करण्याची हमी दिली. लक्ष्मीपूर व चामाेर्शी मायनरसाठी पाणी देण्यास प्रशासन तयार हाेते; परंतु शेतकऱ्यांनी ऐनवेळी पिकाची लागवड केली नाही. सध्या पीक लागवड केलेल्या क्षेत्रासाठी पाणी साेडले जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील रेगडी येथील दिना धरणातील पाण्याचा वापर करून अनेक गावांतील शेतकरी विविध पिके घेतात. खरिपातील अंतिम टप्प्यातही पिकांना पाणी उपलब्ध हाेते तर उन्हाळ्यातही अनेक शेतकरी उन्हाळी धान पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. सध्या तालुक्यात सहा मायनरमधील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली आहे. पीक जाेमात असताना पाण्याची गरज लक्षात घेऊन धरणाचे पाणी साेडण्यात आले. त्यामुळे कडक उन्हाळ्यात पिकांना संजीवनी मिळाली आहे. रेगडी येथील दिना धरणातून चामाेर्शी तालुक्यातील ६ मायनर अंतर्गत येणाऱ्या गावांना उन्हाळी धान पिकासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये साेनापूर, कृष्णनगर, वाघदरा, विक्रमपूर, गाैरीपूर व पेटतळा आदी सहा मायनरचा समावेश आहे. 

 दाेन मायनरमध्ये पीकच नाही चामाेर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ हजार हेक्टरवर धान लागवडीसाठी पाण्याची मागणी केली हाेती; परंतु दिना प्रकल्प प्रशासनाने धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन केवळ ३५० हेक्टरवरील पिकांना पाणीपुरवठा करण्याची हमी दिली. लक्ष्मीपूर व चामाेर्शी मायनरसाठी पाणी देण्यास प्रशासन तयार हाेते; परंतु शेतकऱ्यांनी ऐनवेळी पिकाची लागवड केली नाही. सध्या पीक लागवड केलेल्या क्षेत्रासाठी पाणी साेडले जात आहे.

धरणात पाणीसाठा किती?-   मागील वर्षीच्या पावसाळ्यात चामाेर्शी तालुक्यात समाधानकारक पाऊस आल्याने दिना धरण पाण्याने १०० टक्के भरले हाेते. खरीप हंगामातही पाण्याचा वापर झाल्याने सध्या ३२ टक्के जलसाठा दिना प्रकल्पात शिल्लक आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प