शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या

By admin | Updated: August 17, 2015 22:38 IST

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या
कामठी : तालुक्यात १३ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आजनी-गुमथळा, वडोदा-भूगाव, कोराडी-येरखेडा तसेच महादुला-लोणखैरी आदी भागातील शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला आहे. बहुतांश पिके खरडली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षणातून आलेल्या नोंदीनुसार नुकसानग्रस्तांना तत्काळ शासनाने मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या कुंदा आमधरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
१३ ऑगस्टला झालेल्या जोरदार पावसामुळे कन्हान नदी, पिवळी नदी आणि नाग नदीच्या काठावरील शेतातील पिकांचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आधीच दुबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यातच पावसाने थैमान घातल्याने पिकांची नासाडी झाली. नदीकाठावरील शेतातील पिके अक्षरश: खरडून निघाली तसेच घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे व इतर मालमत्तेचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देण्याची मागणीही कुंदा आमधरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)