शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

गोदावरीच्या पुलाला आबांचे नाव द्या!

By admin | Updated: December 29, 2016 01:46 IST

तेलगंणा-महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाला तत्कालीन पालकमंत्री आर.

सोशल मीडियावरूनही प्रचार : राष्ट्रवादीसह सिरोंचा तालुक्यातील जनतेची मागणी गडचिरोली : तेलगंणा-महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाला तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच गती आली. तत्कालीन काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने या पुलाच्या कामासाठी ३५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आता या पुलाचे लोकार्पण होत आहे. भाजपप्रणीत सरकारने या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह सिरोंचा तालुक्यातील व गडचिरोलीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिरोंचा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचा तालुका आहे. या तालुक्याचा दैनंदिन व्यवहार तेलंगणा राज्यातील जिल्ह्यांमध्ये चालतो. या भागात १४ वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गही मंजूर करण्यात आला. अनेक लोक गोदावरी नदीतून नावेने तत्कालीन आंध्रप्रदेश राज्यात जात होते. सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागाच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीवर पूल बांधल्या गेला पाहिजे, ही पालकमंत्री आर. आर. पाटील यांची भावना होती. गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व २०१० मध्ये स्वीकारल्यानंतर त्यांनी वेळोवेळी सिरोंचाला भेटी देऊन या पुलाच्या जागा प्रस्तावित करण्यापासून ते या कामाचे भूमिपूजन करून त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. स्थानिक खासदार व आमदारांनाही या कामात सोबत घेतले व या पुलाच्या कामाला गती दिली. आज तेलंगणाची बससेवा थेट सिरोंचापर्यंत येऊ लागली आहे. आर. आर. पाटील यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे हा पूल पूर्णत्वास आला. त्यामुळे विद्यमान केंद्र व राज्य सरकारने आर. आर. पाटील यांचे नाव या पुलाला देऊन आपले कर्तव्य पार पाडावे, अशी भावना गडचिरोली जिल्हावासीयांसह सिरोंचा तालुकावासीयांचीही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आर. आर. पाटील यांच्या स्मारकासाठी निधीही मंजूर करून राजकारणातील एक मोठा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर या पुलाला आर. आर. पाटील यांचे नाव देण्याचेही काम मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ३० डिसेंबर रोजी राज्यपाल डॉ. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सिरोंचा येथे या पुलाचे लोकार्पण होऊ घातले आहे. त्या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावरही आबांचे नाव देण्याबाबत प्रचार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या निधीतून हा पूल झाला आहे. तेलंगणातूनही स्थानिक आमदारांचे नाव पुलाला द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. हा संपूर्णत: निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे आपल्याला काहीही सांगता येणार नाही, असे सांगून अप्रत्यक्षरित्या पुलाच्या नावाबाबतच्या प्रश्नाला बगल दिली. गोदावरील नदीच्या पुलाचे काम तत्कालीन गृहमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने झाले. सरकारने या पुलाचे लोकार्पण करताना आर. आर. पाटील यांचे नाव या पुलाला दिले पाहिजे, यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठी प्रचार मोहीम हाती घेण्यात आली आहे. वॉट्सअ‍ॅप, फेसबुक याच्या माध्यमातूनही लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात हा यामागचा हेतू आहे. - श्रीनिवास गोडसेलवार, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली