शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगड्डा प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:14 IST

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची शेतजमीन जात आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा व घरांचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात वडधम, पोचमपल्लीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.गोदावरी नदीवर ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : एकरी ३५ लाख रूपये मोबदला देण्याची शेतकºयांची मागणी; राकाँ पदाधिकाºयांची चर्चा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची शेतजमीन जात आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा व घरांचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात वडधम, पोचमपल्लीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बॅरेज बांधण्याचे काम सुरू केले आहे. या बॅरेजमुळे वडधम, पोचमपल्ली येथील अनेक शेतकºयांची सुपीक जमीन पाण्याखाली जाणार आहे. किनाऱ्यावरील काही घरांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे. जी जमीन पाण्याखाली जात आहे, त्या जमिनीचा मोबदला म्हणून तेलंगणा सरकार केवळ ९ लाख रूपये देण्यास तयार आहे. सध्याचा बाजारभाव जमिनीची सुपिकता लक्षात घेतली तर हा भाव परवडणारा नाही. त्यामुळे किमान ३५ लाख रूपये प्रती एकर एवढा भाव देण्यात यावा, त्याचबरोबर बोअरवेलचे अतिरिक्त अडीच लाख रूपये देण्यात यावे, प्रत्येक घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, शासनाकडून मृत्यूपर्यंत पेंशन लागू करावी, सुपीक जमीन दुसºया ठिकाणी उपलब्ध करून द्यावी, मेडिगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा राज्यालाच अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारने जास्तीत जास्त मोबदला द्यावा, यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावा, पोचमपल्ली, कोतापल्ली, वडधम, आयपेठा येथील नागरिकांची सभा घेऊन जमिनीचा दर निश्चित करावा, तोपर्यंत जमिनीची खरेदी-विक्री बंद करावी. पोचमपल्ली येथील गोदावरी नदीकडे जाणाºया ११२, ११३, १३८, १४३, १३५, १३७, १३६, १४३, १०२ सर्वे क्रमांकाच्या जमिनीतून शेतमालकांची परवानगी न घेताच बळजबरीने आसरअल्ली पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार प्रफुल्ल कदम यांनी नागरिकांना भीती दाखवून रोडची निर्मिती केली आहे. यासाठी ठाणेदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँ जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.राज्य सरकारकडून अपेक्षामेडिगड्डा जलसिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन मात्र सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची जाणार आहे. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी चर्चा करावी, अशी मागणी केली.