शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

गावालगतचे तलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:37 IST

वाढत्या तापमानामुळे तसेच भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील तलाव, बोड्या, नदी, नाले कोरडे पडले आहेत. परिणामी पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे पाणी टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या तीव्र । पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : वाढत्या तापमानामुळे तसेच भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील तलाव, बोड्या, नदी, नाले कोरडे पडले आहेत. परिणामी पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे पाणी टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.गडचिरोली हा जंगलाचा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. येथे ७८ टक्के जंगल असूनही पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक होत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचे सावट निर्माण होत असते. चामोर्शी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी तलाव, बोड्या आहेत. पावसाळ्यात बऱ्यापैकी पर्जन्यमान झाले. मात्र पावसाच्या पाण्याचे साठवणूक व्यवस्थेअभावी करता आली नाही. परिणामी पावसाळ्यात भरलेले तलाव आता पूर्णत: कोरडे पडले आहे. पाळीव जनावरांची तहाण कशी भागवावी, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.ग्रामीण भागातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तसेच हातपंपाची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा गावालगतचा तलाव पूर्णत: कोरडा पडला आहे. अनेक ठिकाणच्या हातपंपाला पाणी येत नाही. सार्वजनिक विहिरींची पाणी पातळी खालावल्याने भेंडाळावासीयांची पायपीट सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई