शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

गावालगतचे तलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:37 IST

वाढत्या तापमानामुळे तसेच भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील तलाव, बोड्या, नदी, नाले कोरडे पडले आहेत. परिणामी पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे पाणी टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या तीव्र । पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : वाढत्या तापमानामुळे तसेच भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील तलाव, बोड्या, नदी, नाले कोरडे पडले आहेत. परिणामी पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे पाणी टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.गडचिरोली हा जंगलाचा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. येथे ७८ टक्के जंगल असूनही पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक होत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचे सावट निर्माण होत असते. चामोर्शी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी तलाव, बोड्या आहेत. पावसाळ्यात बऱ्यापैकी पर्जन्यमान झाले. मात्र पावसाच्या पाण्याचे साठवणूक व्यवस्थेअभावी करता आली नाही. परिणामी पावसाळ्यात भरलेले तलाव आता पूर्णत: कोरडे पडले आहे. पाळीव जनावरांची तहाण कशी भागवावी, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.ग्रामीण भागातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तसेच हातपंपाची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा गावालगतचा तलाव पूर्णत: कोरडा पडला आहे. अनेक ठिकाणच्या हातपंपाला पाणी येत नाही. सार्वजनिक विहिरींची पाणी पातळी खालावल्याने भेंडाळावासीयांची पायपीट सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई