शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

घोटसुरात गॅस्ट्रोचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:30 IST

तालुक्यातील कसनसूरपासून सात किमी अंतर असलेल्या घोटसूर येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून मागील १५ दिवसात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही २९ आॅगस्ट रोजी एका नागरिकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे१५ दिवसांत तिघांचा मृत्यू : दोन क्विंटल ब्लिचिंग पावडर टाकले

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील कसनसूरपासून सात किमी अंतर असलेल्या घोटसूर येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून मागील १५ दिवसात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही २९ आॅगस्ट रोजी एका नागरिकाचा मृत्यू झाला. यावरून घोटसूर येथे गॅस्ट्रोची साथ अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आली नसल्याचे स्पष्ट होत आहे.राजेश ऋषी हेडो (२४) यांचा १६ आॅगस्ट रोजी गावातच मृत्यू झाला. लक्ष्मण कोडू मडावी (६२) यांचा २२ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान अहेरीवरून गडचिरोली येथे नेताना मृत्यू झाला. तर मिटको चन्नू हेडो (६२) या महिलेचा गावातच मृत्यू झाला. रवी दिलीप नरोटे (२२), विठ्ठल माडू लोनबले यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. गॅस्ट्रोची लागण होऊन एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग खळबळून जागे झाले आहे.परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्यासह आरोग्य विभागाची चमू गावात पोहोचली. गावातील विहिरींच्या पाण्याचे नमुने घेतले असता, बहुतांश विहिरींच्या पाण्याचे नमुने दुषित आढळले. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे २०० क्विंटल ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले. तरीही गॅस्ट्रोची साथ पूर्णपणे नियंत्रणात आली नाही. अजुनही गॅस्ट्रोचा त्रास काही नागरिकांना सुरू असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण अजुनही कायम आहे. घोटसूर हे गाव कसनसूरपासून सात किमी अंतरावर आहे. या गावाला जाणारा रस्ता अतिशय खराब आहे. तीन किमी अंतरावर नाला असून या नाल्यावर पूल नाही. त्यामुळे नाल्याच्या पाण्यातून वाहने जात नाही. परिणामी या गावात जाणाऱ्या प्रत्येक नागरिक व अधिकाऱ्याला पायीच जावे लागते. मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गावाजवळचा नाला ओसंडून वाहत आहे. अशाही परिस्थितीत आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी केली. विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकले. पाण्याचा वापर करताना कशी काळजी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.१८५ घरांच्या गावात सुमारे ९० विहिरी, १३ हातपंपघोटसूर या गावात केवळ १८५ घरे आहेत. या गावात सुमारे ७५ कुटुंबांकडे लहान खासगी विहिरी आहेत. तर सरकारी १० विहिरी आहेत. अशा एकूण जवळपास ९० विहिरी आहेत. १३ हातपंप आहेत. यातील बहुतांश विहिरींना कठडे नाहीत. त्यामुळे दारात जमा झालेले पावसाचे पाणी सरळ विहिरीमध्ये जमा होते. तसेच विहिरीजवळ गायींचा गोठा आहे. या गोठ्यातील मलमूत्र सुध्दा पावसाच्या पाण्याबरोबर विहिरीत जाते. पुढे हेच पाणी संबंधित कुटुंबातील नागरिक प्राशन करतात. पाणी शुध्द करण्याबाबत फारशी काळजी घेतली जात नाही. गॅस्ट्रोची लागण झाल्याचे माहित झाल्यानंतर आरोग्य विभागातर्फे या गावातील विहिरी व हातपंप यांच्यामध्ये सुमारे दोन क्विंटल ब्लिचिंग पावडर टाकण्यात आला.गॅस्ट्रोमुळेच तिघांचाही मृत्यू झाला असे म्हणता येणार नाही. मृत्यूची अनेक कारणे असू शकतात. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे. एखादा व्यक्तीला गॅस्ट्रोची लक्षणे दिसून आल्यास त्याच्यावर तत्काळ उपचार केले जात आहेत. पाणी शुध्द करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.- अभिजित गादेवार,तालुका आरोग्य अधिकारी,एटापल्ली

टॅग्स :Healthआरोग्य