शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही!

By दिलीप दहेलकर | Updated: July 25, 2023 20:54 IST

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कृष्णार येथील गणेश लालसू तेलामी या २३ वर्षीय अविवाहित युवकाचा क्षयरोगाने मृत्यू होऊन त्याला रूग्णवाहिका न मिळाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. दुसऱ्या दिवशी जिल्हा व तालुकास्तरावरील चमूने थेट कृष्णार गाव गाठून सदर मृत्यू प्रकरणाबाबतची सत्य परिस्थिती जाणून घेतली असता विदारक वास्तव उजेडात आले. 

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागात अजुनही आदिवासी समाजामध्ये अंधश्रद्धा व अज्ञान आहे. तालुकास्तर व मोठ्या गावापर्यंत शासकीय आरोग्य सेवा पोहोचली असली तरी या भागातील अनेक लोक अज्ञानामुळे रूग्णालयात जाऊन औषधोपचार करीत नाही. असाच प्रकार गणेश तेलामी याच्याबाबत घडला. 

तीन महिन्याआधीपासून गणेशची प्रकृती बिघडली. दरम्यान, तो स्वत: किंवा कुटुंबियांनी शासकीय व कोणत्याही खासगी रूग्णालयात जाऊन औषधोपचार घेतला नाही. गावठी उपचारावर पूर्णत: निर्भर राहिला. अहेरी- भामरागड दरम्यान असलेल्या बांडियानगर येथे पुजाऱ्याकडे जाऊन तब्बल तीन महिने गणेशने गावठी उपचार घेतला. परिणामी प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली. पोटदुखी, अतिसार, ताप आदी त्रास होऊ लागला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर त्याला कुटुंबियांनी हेमलकसाच्या लोकबिरादरी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. येथे गणेशला १७ जुलैला भरती करण्यात आले. १९ जुलैला तो क्षयरोग पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. उपचारादरम्यान त्याचा २० जुलैला मृत्यू झाला.

पोलिसांच्या मदतीने दिली शववाहिकागंभीर रूग्णांना ने-आण करण्यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयामार्फत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. मात्र मृतदेहाला नेण्यासाठी रूग्णवाहिका दिली जात नाही. त्यासाठी शववाहिका देण्याची तरतूद आहे. लोकबिरादरी दवाखान्यातून दुचाकीवर खाट बांधून त्यावर मृतदेह आणताना तेलामी कुटुंबिय पोलिसांना दिसले. दवाखान्यापासून एक किमी अंतरावर आल्यावर भामरागड पोलिसांनी त्यांना अडविले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांना माहिती देताच ते त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे संपर्क साधून शववाहिका बोलाविली व त्यातून मृतदेह पाठवला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

या कारणामुळे झाला मृत्यूगणेशला ताप होता. वजन व रक्त फार कमी होते. रक्त केवळ ७.८ ग्रॅम होते. त्याला रक्ताची गरज होती. त्याला पोटदुखी, अतिसाराचा त्रास होता. मात्र पुजाऱ्याकडे उपचार करण्यात वेळ दवळल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले. याच कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. कधी आंध्रप्रदेश, कधी पेरमिली आदी ठिकाणी राहून तो काम करायचा. त्यामुळे तो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला नाही.

गणेशने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती गंभीर झाल्यावर त्याला लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल केले, अशी माहिती मृतक गणेशचा लहान भाऊ दिलीप लालसू तेलामी यांच्याकडून मिळाली. गणेशची प्रकृती बिघडल्याबाबतची थोडीशीही माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना नव्हती. आज घरी भेट देऊन चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला.- डॉ. भूषण चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, भामरागड 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली