शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही!

By दिलीप दहेलकर | Updated: July 25, 2023 20:54 IST

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कृष्णार येथील गणेश लालसू तेलामी या २३ वर्षीय अविवाहित युवकाचा क्षयरोगाने मृत्यू होऊन त्याला रूग्णवाहिका न मिळाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. दुसऱ्या दिवशी जिल्हा व तालुकास्तरावरील चमूने थेट कृष्णार गाव गाठून सदर मृत्यू प्रकरणाबाबतची सत्य परिस्थिती जाणून घेतली असता विदारक वास्तव उजेडात आले. 

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागात अजुनही आदिवासी समाजामध्ये अंधश्रद्धा व अज्ञान आहे. तालुकास्तर व मोठ्या गावापर्यंत शासकीय आरोग्य सेवा पोहोचली असली तरी या भागातील अनेक लोक अज्ञानामुळे रूग्णालयात जाऊन औषधोपचार करीत नाही. असाच प्रकार गणेश तेलामी याच्याबाबत घडला. 

तीन महिन्याआधीपासून गणेशची प्रकृती बिघडली. दरम्यान, तो स्वत: किंवा कुटुंबियांनी शासकीय व कोणत्याही खासगी रूग्णालयात जाऊन औषधोपचार घेतला नाही. गावठी उपचारावर पूर्णत: निर्भर राहिला. अहेरी- भामरागड दरम्यान असलेल्या बांडियानगर येथे पुजाऱ्याकडे जाऊन तब्बल तीन महिने गणेशने गावठी उपचार घेतला. परिणामी प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली. पोटदुखी, अतिसार, ताप आदी त्रास होऊ लागला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर त्याला कुटुंबियांनी हेमलकसाच्या लोकबिरादरी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. येथे गणेशला १७ जुलैला भरती करण्यात आले. १९ जुलैला तो क्षयरोग पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. उपचारादरम्यान त्याचा २० जुलैला मृत्यू झाला.

पोलिसांच्या मदतीने दिली शववाहिकागंभीर रूग्णांना ने-आण करण्यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयामार्फत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. मात्र मृतदेहाला नेण्यासाठी रूग्णवाहिका दिली जात नाही. त्यासाठी शववाहिका देण्याची तरतूद आहे. लोकबिरादरी दवाखान्यातून दुचाकीवर खाट बांधून त्यावर मृतदेह आणताना तेलामी कुटुंबिय पोलिसांना दिसले. दवाखान्यापासून एक किमी अंतरावर आल्यावर भामरागड पोलिसांनी त्यांना अडविले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांना माहिती देताच ते त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे संपर्क साधून शववाहिका बोलाविली व त्यातून मृतदेह पाठवला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

या कारणामुळे झाला मृत्यूगणेशला ताप होता. वजन व रक्त फार कमी होते. रक्त केवळ ७.८ ग्रॅम होते. त्याला रक्ताची गरज होती. त्याला पोटदुखी, अतिसाराचा त्रास होता. मात्र पुजाऱ्याकडे उपचार करण्यात वेळ दवळल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले. याच कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. कधी आंध्रप्रदेश, कधी पेरमिली आदी ठिकाणी राहून तो काम करायचा. त्यामुळे तो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला नाही.

गणेशने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती गंभीर झाल्यावर त्याला लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल केले, अशी माहिती मृतक गणेशचा लहान भाऊ दिलीप लालसू तेलामी यांच्याकडून मिळाली. गणेशची प्रकृती बिघडल्याबाबतची थोडीशीही माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना नव्हती. आज घरी भेट देऊन चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला.- डॉ. भूषण चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, भामरागड 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली