शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

विद्यार्थी आणि शिक्षकांविनाच साजरी होणार गांधी जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:48 IST

राज्य शासनाने यावर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत साजरी करण्यासोबतच पुढील २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र गांधी जयंतीच्या सुटीमुळे केवळ बापूंच्या फोटोचे पूजन करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळा उघडल्याच जाणार नाही. त्यामुळे गांधी जयंतीला शाळा-महाविद्यालयांपासून तर शासकीय कार्यालयांना सुटी देण्याचे औचित्य काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसुटीचा परिणाम : शासनाचे परिपत्रक ठरणार कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाने यावर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत साजरी करण्यासोबतच पुढील २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र गांधी जयंतीच्या सुटीमुळे केवळ बापूंच्या फोटोचे पूजन करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळा उघडल्याच जाणार नाही. त्यामुळे गांधी जयंतीला शाळा-महाविद्यालयांपासून तर शासकीय कार्यालयांना सुटी देण्याचे औचित्य काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.अहिंसात्मक स्वातंत्र्य लढा देऊन देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त (२ आॅक्टोबर) अभिवादन करण्यासाठी शासनाकडून दरवर्षीच शासकीय सुटी पाळली जाते. पण बापूंच्या प्रतिमेसमोर अभिवादन करण्यासाठी मोजके अधिकारी-कर्मचारी सोडले तर कोणीही आपापल्या कार्यालयाकडे फिरकत नाही. हीच स्थिती बहुतांश शाळा-महाविद्यालयांची आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात तर बहुतांश शाळा शिक्षकांच्या मनमर्जीने सुरू असतात आणि मर्जीनेच बंद असतात. त्यात २ आॅक्टोबरची हक्काची सुटी असताना जवळच्या तालुका किंवा जिल्हा मुख्यालयातून अप-डाऊन करणारे शिक्षक केवळ बापूंना अभिवादन करण्यासाठी शाळांकडे फिरकतच नाही.यावर्षी २० आॅगस्ट रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या परिपत्रकात २ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करावे, तसेच गांधी वंदना घेऊन गांधीजींच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करावा असे कार्यक्रमाचे स्वरूप दिले आहे.याशिवाय पुढील वर्षभरात गांधीजींची असहकार चळवळ, सविनय कायदेभिंग आंदोलन, भारत छोडो आंदोलन यावर निबंध स्पर्धा, विज्ञान जत्रा व प्रदर्शन, गांधी विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गांधीवादी विचारवंतांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम राबविण्याचे सूचित केले आहे.वर्षभर हे कार्यक्रम होतीलही, पण २ आॅक्टोबरला केवळ प्रभातफेरीसाठी विद्यार्थीच काय, शिक्षकही शाळेत येणार नाही अशी स्थिती गडचिरोलीच्या दुर्गम तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पहायला मिळणार आहे.