शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी आणि शिक्षकांविनाच साजरी होणार गांधी जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:48 IST

राज्य शासनाने यावर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत साजरी करण्यासोबतच पुढील २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र गांधी जयंतीच्या सुटीमुळे केवळ बापूंच्या फोटोचे पूजन करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळा उघडल्याच जाणार नाही. त्यामुळे गांधी जयंतीला शाळा-महाविद्यालयांपासून तर शासकीय कार्यालयांना सुटी देण्याचे औचित्य काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसुटीचा परिणाम : शासनाचे परिपत्रक ठरणार कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाने यावर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत साजरी करण्यासोबतच पुढील २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र गांधी जयंतीच्या सुटीमुळे केवळ बापूंच्या फोटोचे पूजन करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळा उघडल्याच जाणार नाही. त्यामुळे गांधी जयंतीला शाळा-महाविद्यालयांपासून तर शासकीय कार्यालयांना सुटी देण्याचे औचित्य काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.अहिंसात्मक स्वातंत्र्य लढा देऊन देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त (२ आॅक्टोबर) अभिवादन करण्यासाठी शासनाकडून दरवर्षीच शासकीय सुटी पाळली जाते. पण बापूंच्या प्रतिमेसमोर अभिवादन करण्यासाठी मोजके अधिकारी-कर्मचारी सोडले तर कोणीही आपापल्या कार्यालयाकडे फिरकत नाही. हीच स्थिती बहुतांश शाळा-महाविद्यालयांची आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात तर बहुतांश शाळा शिक्षकांच्या मनमर्जीने सुरू असतात आणि मर्जीनेच बंद असतात. त्यात २ आॅक्टोबरची हक्काची सुटी असताना जवळच्या तालुका किंवा जिल्हा मुख्यालयातून अप-डाऊन करणारे शिक्षक केवळ बापूंना अभिवादन करण्यासाठी शाळांकडे फिरकतच नाही.यावर्षी २० आॅगस्ट रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या परिपत्रकात २ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करावे, तसेच गांधी वंदना घेऊन गांधीजींच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करावा असे कार्यक्रमाचे स्वरूप दिले आहे.याशिवाय पुढील वर्षभरात गांधीजींची असहकार चळवळ, सविनय कायदेभिंग आंदोलन, भारत छोडो आंदोलन यावर निबंध स्पर्धा, विज्ञान जत्रा व प्रदर्शन, गांधी विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गांधीवादी विचारवंतांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम राबविण्याचे सूचित केले आहे.वर्षभर हे कार्यक्रम होतीलही, पण २ आॅक्टोबरला केवळ प्रभातफेरीसाठी विद्यार्थीच काय, शिक्षकही शाळेत येणार नाही अशी स्थिती गडचिरोलीच्या दुर्गम तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पहायला मिळणार आहे.