शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

विद्यार्थी आणि शिक्षकांविनाच साजरी होणार गांधी जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:48 IST

राज्य शासनाने यावर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत साजरी करण्यासोबतच पुढील २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र गांधी जयंतीच्या सुटीमुळे केवळ बापूंच्या फोटोचे पूजन करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळा उघडल्याच जाणार नाही. त्यामुळे गांधी जयंतीला शाळा-महाविद्यालयांपासून तर शासकीय कार्यालयांना सुटी देण्याचे औचित्य काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसुटीचा परिणाम : शासनाचे परिपत्रक ठरणार कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाने यावर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत साजरी करण्यासोबतच पुढील २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र गांधी जयंतीच्या सुटीमुळे केवळ बापूंच्या फोटोचे पूजन करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळा उघडल्याच जाणार नाही. त्यामुळे गांधी जयंतीला शाळा-महाविद्यालयांपासून तर शासकीय कार्यालयांना सुटी देण्याचे औचित्य काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.अहिंसात्मक स्वातंत्र्य लढा देऊन देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त (२ आॅक्टोबर) अभिवादन करण्यासाठी शासनाकडून दरवर्षीच शासकीय सुटी पाळली जाते. पण बापूंच्या प्रतिमेसमोर अभिवादन करण्यासाठी मोजके अधिकारी-कर्मचारी सोडले तर कोणीही आपापल्या कार्यालयाकडे फिरकत नाही. हीच स्थिती बहुतांश शाळा-महाविद्यालयांची आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात तर बहुतांश शाळा शिक्षकांच्या मनमर्जीने सुरू असतात आणि मर्जीनेच बंद असतात. त्यात २ आॅक्टोबरची हक्काची सुटी असताना जवळच्या तालुका किंवा जिल्हा मुख्यालयातून अप-डाऊन करणारे शिक्षक केवळ बापूंना अभिवादन करण्यासाठी शाळांकडे फिरकतच नाही.यावर्षी २० आॅगस्ट रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या परिपत्रकात २ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करावे, तसेच गांधी वंदना घेऊन गांधीजींच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करावा असे कार्यक्रमाचे स्वरूप दिले आहे.याशिवाय पुढील वर्षभरात गांधीजींची असहकार चळवळ, सविनय कायदेभिंग आंदोलन, भारत छोडो आंदोलन यावर निबंध स्पर्धा, विज्ञान जत्रा व प्रदर्शन, गांधी विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गांधीवादी विचारवंतांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम राबविण्याचे सूचित केले आहे.वर्षभर हे कार्यक्रम होतीलही, पण २ आॅक्टोबरला केवळ प्रभातफेरीसाठी विद्यार्थीच काय, शिक्षकही शाळेत येणार नाही अशी स्थिती गडचिरोलीच्या दुर्गम तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पहायला मिळणार आहे.