शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

गाेकुलनगर, सर्वोदय वॉर्डातून जाताय, वाहनासह स्वत:लाही सांभाळावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : ‘नेमेचि येताे पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पावसाळा आला की, गडचिराेली शहरातील रस्त्यांची दैनावस्था हाेते. मार्गांवरील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : ‘नेमेचि येताे पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पावसाळा आला की, गडचिराेली शहरातील रस्त्यांची दैनावस्था हाेते. मार्गांवरील खड्ड्यांचा आकार वाढताे. त्यात पावसाचे पाणी साचते. डबक्यातील घाण पाणी वाहनधारकांच्या अंगावर उडते. हे चित्र गडचिराेली शहरातील काही भागात दरवर्षीचे झाले आहे. पण त्या भागातील नगरसेवकांसह नगरपालिका प्रशासन याची दखल घेण्यास तयार नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष करून तलावाकडून जाणारा गाेकुलनगर बायपास मार्ग, विसापूर मार्ग आणि शहरातील सर्वोदय वॉर्डमधील प्रमुख रस्त्यांचा यात समावेश आहे.

गडचिराेली शहरातील काही वर्दळीच्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गाेकुलनगर, सर्वाेदय वाॅर्ड, चनकाईनगर, स्नेहनगर, फुले वाॅर्ड, गांधी वाॅर्ड व इतर अनेक भागात रस्ते उखडले असल्याने पावसाळ्यात वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बाॅक्स ....

विसापूर मार्गाचा प्रवास झाला खडतर

गडचिराेली नगरपालिकेच्या हद्दीत विसापूर वाॅर्डाचा समावेश आहे. विसापूर, काेटगल तसेच काॅम्प्लेक्सकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जाताे. शिवाय या मार्गावरून एलआयसी, विविध शासकीय कार्यालय तसेच शाळा, महाविद्यालयांत जाता येते. त्यामुळे या मार्गावर वाहनधारक व सायकलस्वारांची वर्दळ असते. मात्र या मार्गावर माेठमाेठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचले आहे. अर्धा फूट खाेल व दीड ते दाेन फूट रुंदीच्या खड्ड्यांमुळे या मार्गाचा प्रवास खडतर बनला आहे.

काेट ......

आमचे नगरसेवक तर झोपले आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलावे? पण पाऊस आल्यानंतर गुजरी ते फुले वॉर्डकडे जाणाऱ्या एकाच रस्त्यावरून नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी पैदल किंवा दुचाकीने जाऊन दाखवावे. सामान्य माणसांना काय त्रास होतो ते कळेल.

- प्रज्वल दुर्गे, नागरिक

काेट ....

विसापूर ते गडचिराेली या मार्गाचा हजाराे नागरिकांशी संबंध आहे. गडचिराेली शहरात येण्यासाठी याच मार्गाचा आम्ही वापर करताे. मात्र दुरुस्ती करूनही अल्पावधीत आठवडी बाजाराजवळ या मार्गावर माेठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे पेट्राेल अधिक लागत आहे.

- गाेलू तांगळे, नागरिक

काेट .....

तलावाकडून गाेकुलनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने आवागमन धाेक्याचे झाले आहे. खड्ड्यांमुळे माझ्यासह अनेकांना पाठदुखीचा त्रास वाढला आहे. खड्ड्यातून झटके लागत असल्याने त्रास अधिक हाेत आहे.

- मनाेहर गेडाम, नागरिक

बाॅक्स ......

भातगिरणीकडील रस्ता खड्डेमय

आरमाेरी मार्गावरून भातगिरणीकडून ग्रामसेवक भवनापासून धानाेरा मार्गाला जाेडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या भागातील अनेक लाेक सदर मार्गाचा वापर करतात. मात्र या रस्त्याची सध्या प्रचंड दुर्दशा झाली आहे. माेठमाेठे खड्डे पडले असून यात पावसाचे पाणी साचले आहे. येथे प्रशासनाच्या वतीने छाेटा पूल निर्मितीचे काम करण्यात आले. मात्र नियाेजन नसल्याने सदर मार्गावर आता चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करत अवागमन करावे लागत आहे.