शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी वाड्यावर धडकणार

By admin | Updated: July 28, 2016 02:11 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भवाद्यांना भाजपची सरकार केंद्रात आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ,

क्रांतीदिनी पाच हजार विदर्भवादी : वामनराव चटप, राम नेवले यांची माहिती गडचिरोली : भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भवाद्यांना भाजपची सरकार केंद्रात आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ देण्याची त्यांची तयारी दिसून येत नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी नागपूर येथील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. गडकरी यांना जाब विचारण्यासाठी विदर्भातून पाच हजार विदर्भवादी कार्यकर्ते गडकरी वाड्यावर धडक देणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी राज्यमंत्री रमेश गजबे, अ‍ॅड. नंदा पराते, अरूण मुनघाटे, किशोर पोतनवार, अरूण केदार, चंद्रशेखर भडांगे, रमेश भुरसे, प्रतिभा चौधरी, पं.स. सदस्य अमिता मडावी, एजाज शेख आदी उपस्थित होते. यावेळी राम नेवले म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याची लढाई तीव्र करून नागपूर येथील ठिय्या आंदोलन यशस्वी करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी १ जुलैपासून विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात दौरे करून जिल्हा बैठका घेण्यात आल्या. बुधवारी गडचिरोली येथे झालेली शेवटची जिल्हा बैठक होती. गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आम्ही जनजागृती करीत आहोत, जनतेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यांनी त्या संदर्भात कामही सुरू केले आहे. त्यामुळे आता विदर्भ राज्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे नेवले यावेळी म्हणाले. अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, विदर्भ हा नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहे. मात्र भाजप सरकारकडून विदर्भावर अन्याय केला जात आहे. नागपूर करारानुसार विदर्भातील शासकीय व निमशासकीय अशा एकूण चार लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे भारनियमन तसेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा मिळण्यासाठी धानाच्या हमीभावाचा प्रश्न कायम आहे. विदर्भातील जनतेचे अनेक प्रश्न असल्याने स्वतंत्र विदर्भ निर्माण झाल्याशिवाय लोकांना न्याय खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही. यावर स्वतंत्र विदर्भ हाच खरा पर्याय आहे. त्यामुळे आरपारची लढाई आम्ही विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप सरकारच्या विरोधात लढणार आहोत, असे अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)