शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

गडकरी वाड्यावर धडकणार

By admin | Updated: July 28, 2016 02:11 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भवाद्यांना भाजपची सरकार केंद्रात आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ,

क्रांतीदिनी पाच हजार विदर्भवादी : वामनराव चटप, राम नेवले यांची माहिती गडचिरोली : भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भवाद्यांना भाजपची सरकार केंद्रात आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ देण्याची त्यांची तयारी दिसून येत नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी नागपूर येथील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. गडकरी यांना जाब विचारण्यासाठी विदर्भातून पाच हजार विदर्भवादी कार्यकर्ते गडकरी वाड्यावर धडक देणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी राज्यमंत्री रमेश गजबे, अ‍ॅड. नंदा पराते, अरूण मुनघाटे, किशोर पोतनवार, अरूण केदार, चंद्रशेखर भडांगे, रमेश भुरसे, प्रतिभा चौधरी, पं.स. सदस्य अमिता मडावी, एजाज शेख आदी उपस्थित होते. यावेळी राम नेवले म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याची लढाई तीव्र करून नागपूर येथील ठिय्या आंदोलन यशस्वी करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी १ जुलैपासून विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात दौरे करून जिल्हा बैठका घेण्यात आल्या. बुधवारी गडचिरोली येथे झालेली शेवटची जिल्हा बैठक होती. गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आम्ही जनजागृती करीत आहोत, जनतेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यांनी त्या संदर्भात कामही सुरू केले आहे. त्यामुळे आता विदर्भ राज्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे नेवले यावेळी म्हणाले. अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, विदर्भ हा नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहे. मात्र भाजप सरकारकडून विदर्भावर अन्याय केला जात आहे. नागपूर करारानुसार विदर्भातील शासकीय व निमशासकीय अशा एकूण चार लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे भारनियमन तसेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा मिळण्यासाठी धानाच्या हमीभावाचा प्रश्न कायम आहे. विदर्भातील जनतेचे अनेक प्रश्न असल्याने स्वतंत्र विदर्भ निर्माण झाल्याशिवाय लोकांना न्याय खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही. यावर स्वतंत्र विदर्भ हाच खरा पर्याय आहे. त्यामुळे आरपारची लढाई आम्ही विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप सरकारच्या विरोधात लढणार आहोत, असे अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)