शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

महारॅलीने वेधले गडचिरोलीकरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे एका पक्षाचे राहात नसून ते देशाचे आहेत. त्यांनी देशहितासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता या कायद्याचे समर्थन करा, असे आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देसीएएच्या समर्थनार्थ आयोजन : तिरंगा ठरला आकर्षण, जाहीर सभेत रिमझिम पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी राष्ट्रीय एकता मंचतर्फे गुरुवारी (दि.२) गडचिरोली आयोजित केलेल्या महारॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत रिमझिम पावसाने व्यत्यय आणला, तरीही मंचावरून नेत्यांची भाषणे सुरूच होती.चंद्रपूर मार्गावरील लॉनवरून निघालेल्या या रॅलीत प्रामुख्याने खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार सहभागी होते.शहराच्या प्रमुख मार्गाने ही महारॅली निघाल्यानंतर लांबलचक तिरंगा हातात घेऊत सहभागी नागरिक चालत होते. विविध घोषणा देत आणि सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ फलक घेतलेले अनेक नागरिक, महिला, युवक सहभागी झाले होते. रॅलीच्या अग्रस्थानी खुल्या जीपवर तिंरगा ध्वज फडकत होता.यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे एका पक्षाचे राहात नसून ते देशाचे आहेत. त्यांनी देशहितासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता या कायद्याचे समर्थन करा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, राष्ट्रीय एकता मंचचे जिल्हाध्यक्ष रामायण खटी, सचिव गोविंद काबरा, राष्ट्रीय स्वयंस्वेवक संघाचे जिल्हा कार्यवाह घिसुलाल काबरा, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, अभाविपचे जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर, पतंजली योग समितीच्या सुधा सेता, भाजपचे महामंत्री रवी ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, डॉ.शिवनाथ कुंभारे, हेमंत जंबेवार, गजेंद्र डोमळे आदी उपस्थित होते. माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हेसुद्धा सभेच्या शेवटी पोहोचले.या महारॅलीसाठी गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक आले होते.अन् पावसातही केले मार्गदर्शनखा.अशोक नेते यांचे भाषण अर्ध्यावर आले असतानाच पावसाचे थेंब पडणे सुरू झाले. त्यांचे भाषण संपेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू झाला होता. पावसामुळे लोक आडोशाला गेले, पण त्यानंतरही आ.डॉ.देवराव होळी यांनी डोक्यावर रूमाल घेत भाषण सुरूच ठेवून सीएए कायद्याची सकारात्मक बाजू समजावून सांगितली.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेDevrao Holiदेवराव होळी