शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महारॅलीने वेधले गडचिरोलीकरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे एका पक्षाचे राहात नसून ते देशाचे आहेत. त्यांनी देशहितासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता या कायद्याचे समर्थन करा, असे आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देसीएएच्या समर्थनार्थ आयोजन : तिरंगा ठरला आकर्षण, जाहीर सभेत रिमझिम पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी राष्ट्रीय एकता मंचतर्फे गुरुवारी (दि.२) गडचिरोली आयोजित केलेल्या महारॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत रिमझिम पावसाने व्यत्यय आणला, तरीही मंचावरून नेत्यांची भाषणे सुरूच होती.चंद्रपूर मार्गावरील लॉनवरून निघालेल्या या रॅलीत प्रामुख्याने खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार सहभागी होते.शहराच्या प्रमुख मार्गाने ही महारॅली निघाल्यानंतर लांबलचक तिरंगा हातात घेऊत सहभागी नागरिक चालत होते. विविध घोषणा देत आणि सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ फलक घेतलेले अनेक नागरिक, महिला, युवक सहभागी झाले होते. रॅलीच्या अग्रस्थानी खुल्या जीपवर तिंरगा ध्वज फडकत होता.यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे एका पक्षाचे राहात नसून ते देशाचे आहेत. त्यांनी देशहितासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता या कायद्याचे समर्थन करा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, राष्ट्रीय एकता मंचचे जिल्हाध्यक्ष रामायण खटी, सचिव गोविंद काबरा, राष्ट्रीय स्वयंस्वेवक संघाचे जिल्हा कार्यवाह घिसुलाल काबरा, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, अभाविपचे जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर, पतंजली योग समितीच्या सुधा सेता, भाजपचे महामंत्री रवी ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, डॉ.शिवनाथ कुंभारे, हेमंत जंबेवार, गजेंद्र डोमळे आदी उपस्थित होते. माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हेसुद्धा सभेच्या शेवटी पोहोचले.या महारॅलीसाठी गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक आले होते.अन् पावसातही केले मार्गदर्शनखा.अशोक नेते यांचे भाषण अर्ध्यावर आले असतानाच पावसाचे थेंब पडणे सुरू झाले. त्यांचे भाषण संपेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू झाला होता. पावसामुळे लोक आडोशाला गेले, पण त्यानंतरही आ.डॉ.देवराव होळी यांनी डोक्यावर रूमाल घेत भाषण सुरूच ठेवून सीएए कायद्याची सकारात्मक बाजू समजावून सांगितली.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेDevrao Holiदेवराव होळी