शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

गडचिरोलीच्या ग्रामीण भागातही भाजपची मुसंडी

By admin | Updated: October 21, 2014 22:51 IST

विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचंड मताधिक्य मिळाले आहे. पक्षाचाही एकही जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यात

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचंड मताधिक्य मिळाले आहे. पक्षाचाही एकही जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यात नसतांना भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात मारलेली मुसंडी निश्चितच मोठी आहे. भाजपच्या खालोखाल काँग्रेस पक्षानेही गडचिरोलीच्या ग्रामीण भागात चांगले मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे गडचिरोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांसाठी आता ही मताधिक्य दोन वर्षानंतर धोक्याची घंटा वाजविण्याची शक्यता आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे कोटगल-मुरखळा जि. प. क्षेत्राचे सदस्य केसरी पाटील उसेंडी हे स्वत: शिवसेनेकडून मैदानात असतांनाही त्यांच्या क्षेत्रात शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. गडचिरोली तालुक्यात कोटगल-मुरखळा, वसा-पोर्ला, जेप्रा-विहिरगाव, मौशिखांब-मुरमाडी, येवली-पोटेगाव हे पाच जिल्हा परिषद क्षेत्र आहे. यातील दोन क्षेत्रांमध्ये काँग्रेस, दोन क्षेत्रामध्ये अपक्ष तर एका क्षेत्रात युवाशक्ती आघाडीच्या बॅनरवर निवडून आलेल्या महिला सदस्य जि. प. मध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. कोटगल-मुरखळा क्षेत्रात भाजपला ३ हजार २०६, राष्ट्रवादी काँग्रेसला १ हजार २८२, शिवसेनेला १ हजार २१४, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ५५९ तर बहुजन समाज पक्षाला १ हजार ८२ मते मिळाली. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती असलेले विश्वास भोवते यांच्या वसा-पोर्ला क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच वाताहात झाली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ८०६ मते मिळाली. भाजपला ३ हजार ५८०, शिवसेनेला १ हजार २६, काँग्रेसला ६३७ व बहुजन समाज पार्टीला ८०८ मते मिळाली. जेप्रा-विहिरगाव जि. प. क्षेत्रात भारतीय जनता पार्टीला २ हजार ७२१, राष्ट्रवादी काँग्रेसला ६५८, शिवसेनेला ५२४, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १ हजार ५० तर बहुजन समाज पार्टीला ८४२ मते मिळाली. मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पार्टीला ३ हजार ८९९, राष्ट्रवादी काँग्रेसला १ हजार १४४, शिवसेनेला ७७३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ९९५ तर बहुजन समाज पार्टीला ५९५ मते मिळाली. येवली-पोटेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ३ हजार ९७०, राष्ट्रवादी काँग्रेसला ६५५, शिवसेनेला १ हजार ६३०, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ९२७ तर बहुजन समाज पार्टीला ९०८ मते मिळाली. (शहर प्रतिनिधी)