शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गडचिरोलीवासीयांनी जाणला लालपरीचा संघर्षमय इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 23:38 IST

राज्यातील नागरिकांच्या वातुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसटीने अनेक स्थित्यंतरे व संघर्ष करीत आजपर्यंतचा टप्पा गाठला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एसटीने आपुलकी निर्माण केली आहे.

ठळक मुद्देप्रतिकृतीही ठेवल्या : प्रदर्शनाला शेकडो विद्यार्थ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील नागरिकांच्या वातुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसटीने अनेक स्थित्यंतरे व संघर्ष करीत आजपर्यंतचा टप्पा गाठला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एसटीने आपुलकी निर्माण केली आहे. एसटीचा इतिहास राज्यभरातील जनतेला कळावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व बस फॉर अस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारी लालपरीची’ हा चित्ररथ तयार केला. सदर चित्ररथ महाराष्ट्रभर फिरत आहे. हा चित्ररथ गडचिरोली येथे १४ आॅगस्ट रोजी दाखल झाला. १६ आॅगस्ट रोजी चित्ररथाचे प्रदर्शन विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी ठेवण्यात आले.या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसटीचे विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे, सांख्यिकी अधिकारी गौरखेडे, सुरक्षा अधिकारी कानफाडे, आगार प्रमुख मंगेश पांडे, बँक संचालक लक्ष्मीकांत चौधरी, रवी बुरले, किशोर लिंगलवार, विलास भुरसे, सुनील खोब्रागडे, विनोद धकाते, जयप्रकाश तनगुलवार, विवेक फाये, रोहिनी पुन्नमवार, सोनी फाये, लता जोगे, माधुरी चिताडे, सरीता सराफ, पवन बासनवार, जे. टी. खोब्रागडे, एम. ए. राठोड, किशोर वानखेडे उपस्थित होते.१९४८ साली पुणे ते अहमदनगर मार्गावर पहिली बस धावली. हळूहळू एसटीचा महामंडळाचा विस्तार वाढत जाऊन संपूर्ण राज्यात विस्तार झाला. एसटी बसगाड्यांमध्ये झालेल्या बदलांची माहिती व प्रतिकृती प्रदर्शनात ठेवल्या होत्या. बस फॉर अस फाऊंडेशनचे रोहित धेंडे, रवी मडगे, सुमेध देशभ्रतार, संयम धाक, सुशांत अवसरे, संजय शिंगाने हजर होते. शेकडो विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लालपरीचा इतिहास जाणून घेतला.लोकबिरादरीत समारोप‘वारी लालपरीची’ प्रदर्शनाला १ जून २०१९ रोजी मुंबई येथून सुरूवात झाली. राज्यातील ५० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा चित्ररथ फिरला. राज्याच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात प्रदर्शनाचा समरोप होणार आहे.

टॅग्स :state transportएसटी